शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गृहमंत्री देशमुख प्रकरणी काँग्रेसला विश्वासात घेतले नाही, प्रदेश काँग्रेसची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 7:59 AM

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी झाली. त्यासोबतच काँग्रेसलाही विनाकारण वाईटपणा आला. आघाडी सरकारचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी चांगल्या समन्वयाची गरज आहे

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी झाली. त्यासोबतच काँग्रेसलाही विनाकारण वाईटपणा आला. आघाडी सरकारचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी चांगल्या समन्वयाची गरज आहे, हा मुद्दा दिल्लीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालतील, असा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत शुक्रवारी झाला. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी ही बैठक बोलावली होती.पाटील यांच्यासोबत पक्षाचे सचिव सोनल पटेल, वामशी रेड्डी, संपत कुमार, डी. एम. संदीप, आशिष दुवा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक मंत्री बैठकीला उपस्थित होते. बैठकीत चार प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात बदनामी टाळता आली असती. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेवटच्या टप्प्यात जी बाजू मांडली, ती त्यांनी आधीच मांडली असती तर ही बदनामी झाली नसती. त्याशिवाय तिन्ही पक्षांच्या प्रमुख मंत्र्यांना विश्वासात घेऊन काय घडले आहे, हे सांगितले असते तर तिन्ही पक्षांचे मंत्री माध्यमांसमोर एकत्रितपणे सामोरे गेले असते. त्यामुळे सरकार म्हणून बदनामी झाली नसती. यापुढे हा समन्वय जास्तीत जास्त वाढविण्याची गरज आहे, ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्या, असे प्रभारी पाटील यांनी सांगितले.शिवसेना नेते खा. संजय राऊत विविध वक्तव्ये करत आहेत. त्याबद्दल दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची थेट संपर्क साधावा आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाविषयी वादग्रस्त विधाने करण्यापासून त्यांना रोखावे, असा निर्णयही बैठकीत झाला. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना म्हणावा तसा विकास निधी मिळत नाही. वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी थोरात आणि चव्हाण यांनी बोलावे. ही असमानता त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, अशा सूचनाही पाटील यांनी केल्या.लॉकडाऊन विषयीदेखील बैठकीत चर्चा झाली. लॉकडाऊन शक्यतो टाळावा, मात्र रुग्ण संख्या वाढू लागली तर प्रारंभी कठोर उपाययोजना करावी. त्यानंतर पर्यायच उरला नाही तर लॉकडाऊनविषयी निर्णय घ्यावा, असा सर्व मंत्र्यांचा आग्रह होता. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री बंटी पाटील वगळता सर्व मंत्री बैठकीला हजर होते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस