शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचे प्रतिआव्हान, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Updated: March 1, 2021 13:05 IST

Devendra Fadnavis's response to the challenge given by Ajit Pawar : आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

मुंबई - आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदावरूनही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल अजित पवार यांनी विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणून दाखवा आम्ही तो वाजवून दाखवू असे आव्हान दिले होते. त्यानंतर अजित पवारांच्या (Ajit Pawar) या आव्हानाला विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिआव्हान दिले आहे. (Devendra Fadnavis's response to the challenge given by Ajit Pawar ) 

फडणवीस म्हणाले की, विधिमंडळाच्या कामकाजाबाबत घटनेनं जी जबाबदारी दिली आहे ती झटकायचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. राज्यपालांनी नियमानुसार अध्यक्षपदाची निवडणूक घ्या असा सल्ला दिला होता. मात्र राज्य सरकारने तो ऐकलेला नाही. दरम्यान, काल अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून अजित पवार यांच्या मनातली भीती दिसून आली. अजित पवार यांना अध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांचेच आमदार, मंत्री विरोधात मदत करतील, अशी भीती वाटतेय, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच अजित पवार यांनी काल केलेल्या विधानाला काही अर्थ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.  

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना सभागृहात उपस्थित राहणे, आणि मतदान करणं शक्य नसल्याने यंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या वरळीतील पबमधील व्हिडीओंवरूनही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. सोशल डिस्टंसिंग हे शिवजयंतीला असते. नाईट लाइफला तर सरकारने परवानगी दिलेली आहे. बाकी मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना सल्ले देत नाहीत, कारण मंत्री आपल्याला ऐकत नाहीत, हे त्यांना माहिती आहे. सरकारमधी अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. त्यामुळे ते स्वत:च सगळे निर्णय घेतात असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण