शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती, संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 10:51 IST

coronavirus in India: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यामुळे चिंतेत भर पडत आहे.

मुंबई - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत आहे. (coronavirus in India) वाढती रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यामुळे चिंतेत भर पडत आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी कोरोनामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत केंद्र सरकारने याविषयावर चर्चा करण्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. (war-torn situation in the country due to Coronavirus, Sanjay Raut demand the A Spl session of the Parliament)

संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली. त्यात ते म्हणाले की, वाढत्या कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरात युद्धजन्य परिस्थितीसारखे वातावरण आहे. युद्धातील बॉम्बहल्ल्यात जशी माणसं मरतात तशी माणसं मरत आहेत. कोरोनाची आकडेवारील लपवण्याचे प्रकार बंद झाले आहेत. चिता जळताना दिसत आहेत. रुग्णसंख्या अजून वाढली तर देशात अराजक निर्माण होईल. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेचं दोन दिवसांच विशेष अधिवेशन बोलवावं. यामध्ये आम्ही सोशल डिस्टंसिंग पाळून सहभागी होऊ. या अधिवेशात खासदारांना आपापल्या राज्यामधील समस्या मांडता येतील, असे राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, मुंबईत रेमडेसिविरवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरही संजय राऊत यांनी आपले मत मांडले. या प्रकरणात विरोधकांची काय मजबुरी आहे कळत नाही. रेमडेसिविरची साठेबाजी नफेखोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून कारवाई होत होती. मात्र विरोधकांना नफेखोरांच्या मागे का उभे राहावे लागतेय, त्यामागची मजबुरी कळत नाही आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

या प्रकरणात लपवाछपवी सुरू होती. राजकारण सुरू होते. राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या प्रतिक्रियांमधून तसे संकेत मिळत आहेत. आता या प्रकरणात चौकशी करण्याचे संकेत जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे संकेत दिले आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण