शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

…मग बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे?; पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 11:24 AM

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेआरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहेजातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत.

मुंबई -  राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानं परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यातच कोरोना लसीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण कार्यक्रम ठप्प झालेत. या संपूर्ण परिस्थितीमुळे विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोगयमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहून अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP Pankaja Munde Letter to Health Minister Rajesh Tope over Demand for Corona Vaccine)

पंकजा मुंडे यांनी पत्रात म्हटलंय की, बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ३४ हजार ९८९ इतकी आहे त्यातील ३० हजार ४७८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीनं रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे असं त्यांनी सांगितले.

त्यामुळे जातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या २ लाख लसींपैकी बीडला इतर जिल्ह्याच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत ही अतिशय खेदजनक बाब आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा लसी उपलब्ध करून द्यावेत आणि तशी व्यवस्था करण्यासाठी संबधित यंत्रणेला सूचित करावे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

महाराष्ट्राची कामगिरी सरसच

उपलब्ध आकडेवारीनुसार, भाजपशासित राज्यांमध्येही कमी लसीकरण झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, तसेच पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये लसींचा गंभीर तुटवडा दिसून आला. आठवडाभरापूर्वीच लसींची निर्यात थांबविल्यानंतरही लसींचा तुटवडा कशामुळे निर्माण होत आहे, या प्रश्नाने प्रशासनाला भंडावून सोडले आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राने १४ एप्रिलला लसीकरणात इतर तीन दिवसाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाCorona vaccineकोरोनाची लसRajesh Topeराजेश टोपे