शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

CoronaVirus Live Updates : "कोरोना आणि बिहार सरकारमध्ये साम्य; दोघेही जनतेच्या जीवासाठी घातक व अदृश्य"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 9:02 AM

RJD President Lalu Prasad Yadav Slams Bihar Government Over Corona Virus : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोना परिस्थितीवरून निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली असून दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल आहे. काही राज्यांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोना परिस्थितीवरून निशाणा साधला आहे. 

कोरोना आणि बिहार सरकारमध्ये साम्य असल्याचं लालू प्रसाद यादव (RJD President Lalu Prasad Yadav) यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "कोरोना आणि बिहार सरकारमध्ये काही साम्य आहे. दोघेही जनतेच्या जीवासाठी घातक आहेत आणि दोन्ही अदृश्य (दिसून येत नाही) आहेत" असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी टीकास्त्र सोडलं आहे. या आधी यादव यांनी बक्सरमधील येथील नदीत आढळून आलेल्या मृतदेहांवरून देखील सरकारला घेरलं होतं. "कुठं घेऊन जात आहात देशाला व मानवतेला?" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. सध्या लालू प्रसाद यादव हे जामिनावर तुरूंगातून बाहेर आले आहेत.

"जिवंतपणी औषध, ऑक्सिजन, बेड आणि उपचार नाही दिले. मृत्यूनंतर लाकडं, दोन फूट कापड आणि जमीन देखील नशीबी आली नाही. मृतदेहांना गंगेत फेकण्यात आलं. जंगली प्राणी मृतदेहांची लचके तोडत आहेत. हिंदुंचं दफन केलं जात आहे, कुठं घेऊन जात आहात देशाल व मानवतेला?" असं ट्विट लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. यादव यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची तुलना १९९६-९७ सालच्या पोलिओ लसीकरण मोहिमेशी केली. तसंच सध्या सरकार पैसे घेऊनही लस उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचं म्हटलं. "१९९६-९७ मध्ये जेव्हा देशात जनता दलाचं सरकार होतं तेव्हा आम्ही पोलिओ लसीकरणात जागतिक विक्रम केला होता," असं लालू प्रसाद यादव म्हणाले. 

"आज लोकांकडून पैसे घेऊनही लस उपलब्ध करता येत नाहीये हे पाहून अतिशय दु:ख होत आहे. या महासाथीच्या काळाक देशभरातील लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांचं मोफत लसीकरण करण्याची त्यांनी घोषणा करावी असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत आहेत," असं लालू प्रसाद यादव यांनी नमूद केलं. राज्य आणि केंद्रासाठी लसींची किंमत निरनिराळी असू नये. राज्यांमुळेच देशाची निर्मिती होते. प्रत्येक नागरिकाचं लसीकरण टप्प्याटप्प्यानं मोफत झालं पाहिजे ही केंद्राची जबाबदारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणIndiaभारत