शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

Corona Virus: विरोधी पक्षांचे धोरण हे काेलांटउड्या मारणारे, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 5:43 AM

Corona Virus: सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा  उल्लेख करून रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, “विरोधी पक्ष महिनाभरात आपली भूमिका बदलत आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कोरोना विषाणूवरील लस घेतली का, असा प्रश्न संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विचारला, तर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कोरोना महामारीविरोधातील लढाईत विरोधी पक्षांचे धोरण हे काेलांटउड्या मारणारे आहे, असा आरोप केला. ते म्हणाले, लसीकरण मोहिमेत होईल तेवढे अडथळे ते निर्माण करीत आहेत. 

सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा  उल्लेख करून रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, “विरोधी पक्ष महिनाभरात आपली भूमिका बदलत आहेत. लसीकरण मोहिमेला खीळ घालण्याच्या एकमेव उद्देशाने विरोधी पक्ष राजकारण करीत आहेत हे यातून दिसते.” १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचे ठरवले तेव्हा आरोग्य हा विषय राज्य सरकारांचा असल्याचा आणि राज्यांना लस प्राप्त करून घेऊन त्या वितरित करण्याची मुभा दिली जायला हवी असा विशिष्ट राग आळवला गेला.

विरोधकांनी मग भूमिकाच बदलली    प्रसाद यांनी म्हटले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी असे सुचविले होते की,  भारताची रचना ही संघराज्याची असून, आरोग्य हा राज्यांचा विषय आहे, त्यामुळे केंद्र सरकार त्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.    १२ मे रोजी सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसी या केंद्र सरकारने प्राप्त केल्या पाहिजेत, असे पत्र लिहिले होते.

प्रल्हाद जोशी म्हणाले...प्रल्हाद जोशी म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी लस घेतलेली नाही. त्यांचा भारतीय लसीवर विश्वास नाही. आम्ही गेल्या जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात केली तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. आता मात्र ते लस घेत आहेत.”  

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादcorona virusकोरोना वायरस बातम्या