शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

राहुल गांधींच्या नेतृत्वाची धार बोथट करण्याचे षडयंत्र;  ‘त्या’ पत्रावर संजय निरुपम यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 1:06 AM

सोनिया गांधी यांनी राजीनामा का द्यायचा? केंद्रीय कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनीच राजीनामे द्यायला हवे.

मुंबई : काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व मिळावे, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पाठविलेले पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या विरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

काँग्रेस केंद्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच हे पत्र माध्यमांत झळकल्याने पक्षातील नेतृत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पक्षाची पुढील वाटचाल आणि नेतृत्वाबाबत काही दिवसांपूर्वी हे पत्र लिहिले होते. निरुपम यांनी या पत्रप्रपंचावर टीका केली आहे. हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत बंद खोलीत जी षडयंत्रे रचली जात होती, ती या पत्राच्या रूपाने समोर आली. याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारणार नसल्याचा हट्ट सोडून द्यावा, नेतृत्व हाती घ्यावे व पक्षाची पडझड थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधीच काँग्रेसला वाचवू शकतात, असे निरुपम म्हणाले.

सोनिया गांधी यांनी राजीनामा का द्यायचा? केंद्रीय कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनीच राजीनामे द्यायला हवे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. कार्यकारिणीही पराभवाला जबाबदार असल्याचे सांगत, आतापर्यंत किती सदस्यांनी राजीनामे दिले, असा सवाल निरुपम यांनी केला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी