शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

“तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुलं ते आधी सांगा”; माजी मंत्र्यांची योगींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:54 IST

लोकसंख्या नियंत्रणासाठी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने एक विधेयक आणले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्यात.

लखनऊ: लोकसंख्या नियंत्रणासाठी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने एक विधेयक आणले आहे. राज्य विधी आयोगाने उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयक २०२१ चा मसुदा तयार केला आहे. मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या असून, योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यातच आता काँग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी योगी सरकारवर निशाणा साधत तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुले ते आधी सांगा, अशी विचारणा केली आहे. (congress salman khurshid criticised yogi govt over population control law)

योगी सरकारने आणलेल्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकानुसार, दोनपेक्षा अधिक मुलंबाळं असणाऱ्या नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढता येणार नाहीत, सरकारी नोकरीसाठी ते पात्र नसतील, तसंच पदोन्नती तसंच सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. यावरून काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री सलमान खुर्शीद यांनी योगी सरकारवर खोचक टीका केली आहे. 

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

त्यानंतरच विधेयक मंजूर करा

सलमान खुर्शीद यांनी कोरोना तपासणी केंद्राचे उद्घाटन केले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडले. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याआधी सरकारने जाहीर करावे की, त्यांच्या मंत्र्यांना किती मुले आहेत. त्यानंतर हे विधेयक मंजूर करावे, असे खुर्शीद यांनी म्हटले आहे. 

जसे विचार करणार, तसेच बोलणे

सलमान खुर्शीद यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनात जसे भाव, तसेच विचार आणि कृत्य केली जातात, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी पलटवार केला आहे. दरम्यान, राज्य विधी आयोग सध्या राज्यातल्या लोकसंख्या नियंत्रण, स्थिरीकरण आणि कल्याण यासाठी काम करत असून, १९ जुलैपर्यंत यावर जनतेची मते मागवण्यात आली आहेत.  

टॅग्स :Politicsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसsalman khurshidसलमान खुर्शिदBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश