शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Rajiv Satav: नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्या होमपिचवरही भाजपाला घाम फोडणारे काँग्रेसचे 'चाणक्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:58 IST

२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रभारी म्हणून राजीव सातव यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.

ठळक मुद्दे२००९ च्या कळमनुरी मतदारसंघातून आमदार ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार त्यानंतर राज्यसभा खासदार असं लोकप्रतिनिधित्व केले आहे. गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने राजीव सातव यांचे पक्षीय संघटन कौशल्य कामाला आले. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन आकडी जागा मिळतील का नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती

मुंबई - काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. नुकतेच ते कोरोनातून बरे झाले होते. परंतु त्यानंतर ते सायटोमेगँलो व्हायरस या आजाराच्या विळख्यात अडकले. शुक्रवारपासून राजीव सातव यांची तब्येत खालावत होती. अखेर रविवारी पहाटे राजीव सातव यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली.

राजीव सातव यांच्या निधनानं काँग्रेसची मोठी हानी झाली आहे. खुद्द पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनीही माझा मित्र गमावला, आपलं मोठं नुकसान झालं अशा शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अत्यल्प काळात राजीव सातव यांनी राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवला होता. २००९ च्या कळमनुरी मतदारसंघातून आमदार ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार त्यानंतर राज्यसभा खासदार असं लोकप्रतिनिधित्व केले आहे. त्याचसोबत पक्षामध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष हिरारीने सांभाळलं आहे.

राजीव सातव यांची ही कामगिरी पाहता ते राहुल गांधींच्या अत्यंत विश्वासू शिलेदारांमध्ये जाऊन बसले. पंतप्रधान नरेद्र मोदी(PM Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शहा(Amit Shah) यांच्या होम पिचवर गुजरातमध्ये २०१७ मध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसने प्रभारी म्हणून राजीव सातव यांच्यावर जबाबदारी सोपवली. या निवडणुकीच्या निमित्ताने राजीव सातव यांचे पक्षीय संघटन कौशल्य कामाला आले. अक्षरश: गुजरात विधानसभा निवडणुकीत राजीव सातव यांच्या रणनीतीने भाजपाला जेरीस आणलं होतं.

२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन आकडी जागा मिळतील का नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. या निवडणुकीत अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडवली. गुजरात हा भाजपाचा गड मानला जातो. याठिकाणी भाजपाची सत्ता आहे. भाजपाला पूरक असं वातावरण गुजरातमध्ये आहे. त्यामुळे भाजपा विधानसभा निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळवणार हे सर्वांनाच माहिती होते. परंतु २०१७ च्या निवडणुकीत सत्ता काय ठेवण्यासाठी भाजपाची दमछाक झाल्याचं दिसून आलं होतं.

२०१७ च्या निवडणुकीत भाजपाला ९९ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला अनपेक्षितपणे ८० जागा मिळाल्या होत्या. तर अन्य ३ उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीत राजीव सातव यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक सगळेच करतात. कारण २०१२ च्या गुजरात निवडणुकीत भाजपाला ११९ जागा तर काँग्रेसला अवघ्या ५७ जागा मिळाल्या होत्या. नरेंद्र मोदी लाट असतानाही खुद्द पंतप्रधान मोदींच्या होमपिचवर काँग्रेसच्या शिलेदाराने भाजपाला घाम फोडला होता.   

टॅग्स :HingoliहिंगोलीRajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसBJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी