शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मुख्यमंत्री शिवसेनेचा, त्यांना कोणी रोखलंय?; सेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 14:40 IST

congress leader sanjay nirupam slams shiv sena and cm uddhav thackeray: संजय राऊतांची अनिल देशमुखांवर टीका; संजय निरुपम यांचं शिवसेनेला प्रत्युत्तर

मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरणात समोर आलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण स्फोटक बनलं आहे. स्फोटक प्रकरणात असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा हात, त्यामुळे अडचणीत आलेलं सरकार, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यावरून भारतीय जनतापक्ष आक्रमक झाला असताना आता महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्येही ऑल इज वेल नसल्याचं दिसतं आहे. देशमुखांना अपघाताने मिळाले गृहमंत्रीपद, राऊतांनी रोखठोक चालवले बाणशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेचे बाण सोडले. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावं लागलं असं एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट गृहमंत्र्यांनी कसं दिलं होतं, अशा पत्राचा स्फोट केला. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असलेला सचिन वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?, असा 'रोखठोक' सवाल राऊत यांनी विचारला.संजय राऊत यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसेना वि. राष्ट्रवादी यांच्यात वाकयुद्ध रंगताना दिसत आहे. त्यातच आता काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेनं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या वर्तणुकीवर शंका उपस्थित केली आहे. गृहमंत्र्यांच्या भविष्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे आणि त्यांनी मौन धारण केलं आहे. त्यांना कारवाई करण्यापासून कोणी रोखलं आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळराऊतांच्या विधानावर अजित पवार म्हणतात...संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. 'सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांबद्दल अशी विधानं करू नये. एकमेकांविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी. ते काय बोलले, हे त्यांना माहीत आहे. पवारांनी अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले आहेत. अनेकदा उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णयदेखील त्यांनी घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू असताना कोणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये,' अशा शब्दांत पवारांनी राऊत यांनी अप्रत्यक्ष सल्ला दिला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSanjay Rautसंजय राऊतSanjay Nirupamसंजय निरुपमAjit Pawarअजित पवारsachin Vazeसचिन वाझे