शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

E Sreedharan : भाजप सांप्रदायिक नाही, तर देशावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष : ई श्रीधरन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 08:29 IST

bjp is not communal party of people who loves country metro man e sreedharan said in interview : भाजपसाठी सर्व धर्म समान, सांप्रदायिक भेदभावाचा आरोप करणं अयोग्य, श्रीधरन यांचं वक्तव्य

ठळक मुद्देभाजप सांप्रदायिक पक्ष नसल्याचं ई श्रीधरन यांचं वक्तव्यभाजपसाठी सर्व धर्म समान : ई श्रीधरन

केरळ विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीच मेट्रो मॅन म्हणून ओळख असलेले ई श्रीधरन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. दरम्यान ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेली प्रशंसा नाही, तर भाजपची मूल्यं आहेत. ज्यांनी त्यांना पक्षात सामील होण्यासाठी प्रेरित केलं, असं श्रीधरन यांनी सांगितलं."भाजप हा सांप्रदायिक पक्ष नाही. हा देशावर प्रेम करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे. केरळमध्ये हिंदू, ख्रिस्ती मुलींना भुरळ घालण्याचे प्रयत्न करत आहे. ज्यालाच भाजप लव्ह जिहाद असं म्हणत आहे," असं श्रीधरन म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. "मी माझ्या जबाबदारींमध्ये व्यस्त होतो. आता मी समाज आणि विशेषत: आपलं राज्य केरळ यासाठी काहीतरी करू इच्छित आहे. हेच राजकारणात प्रवेश करण्याचं कारण आहे. गेल्या १५-२० वर्षात देशात युडीएफ, एलडीएफचं सरकार होतं. परंतु राज्यात मोठा कोणताही बदल दिसला नाही. २० वर्षांत केरळमध्ये एकही उद्योग आला नाही. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे," असं श्रीधरन यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत सांगितलं. ... म्हणून भाजपशी जोडलो गेलोभले केरळमध्ये भाजपचा एकच आमदार आहे, तरी मी पक्षाची प्रतीमा बदलण्यासाठी आणि पक्ष पुढे नेण्यासाठी भाजपशी जोडलो गेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशीदेखील आपले उत्तम संबंध होते. देशाच्या प्रती प्रेम आणि देशाच्या हितासाठी सेवा करण्याची भावना भाजपमध्ये असल्याचंही श्रीधरन यांनी नमूद केलं.भाजपसाठी सर्व धर्म समान"मी प्रत्येक मतदाराच्या हृदयात जागा निर्माण करू पाहत आहे. मला कोणतं काम करण्याची इच्छा आहे हे मी त्यांना सांगू इच्छितो. माझ्या प्रचाराची पद्धत निराळी असेल," असं निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले. भाजप सांप्रदायिक असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की भाजप सर्व धर्मांना समान रुपात पाहतो. मोदी सरकारदेखील तेच करत आहे. मी त्यांना कधीच कोणत्या अन्य धर्मावर हल्ला करताना पाहिलं नाही. भाजपवर सांप्रदायिक भेदभावाचा आरोप अयोग्य असल्याचंही श्रीधरन म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाKeralaकेरळNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी