शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

E Sreedharan : भाजप सांप्रदायिक नाही, तर देशावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष : ई श्रीधरन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 08:29 IST

bjp is not communal party of people who loves country metro man e sreedharan said in interview : भाजपसाठी सर्व धर्म समान, सांप्रदायिक भेदभावाचा आरोप करणं अयोग्य, श्रीधरन यांचं वक्तव्य

ठळक मुद्देभाजप सांप्रदायिक पक्ष नसल्याचं ई श्रीधरन यांचं वक्तव्यभाजपसाठी सर्व धर्म समान : ई श्रीधरन

केरळ विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीच मेट्रो मॅन म्हणून ओळख असलेले ई श्रीधरन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. दरम्यान ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेली प्रशंसा नाही, तर भाजपची मूल्यं आहेत. ज्यांनी त्यांना पक्षात सामील होण्यासाठी प्रेरित केलं, असं श्रीधरन यांनी सांगितलं."भाजप हा सांप्रदायिक पक्ष नाही. हा देशावर प्रेम करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे. केरळमध्ये हिंदू, ख्रिस्ती मुलींना भुरळ घालण्याचे प्रयत्न करत आहे. ज्यालाच भाजप लव्ह जिहाद असं म्हणत आहे," असं श्रीधरन म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. "मी माझ्या जबाबदारींमध्ये व्यस्त होतो. आता मी समाज आणि विशेषत: आपलं राज्य केरळ यासाठी काहीतरी करू इच्छित आहे. हेच राजकारणात प्रवेश करण्याचं कारण आहे. गेल्या १५-२० वर्षात देशात युडीएफ, एलडीएफचं सरकार होतं. परंतु राज्यात मोठा कोणताही बदल दिसला नाही. २० वर्षांत केरळमध्ये एकही उद्योग आला नाही. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे," असं श्रीधरन यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत सांगितलं. ... म्हणून भाजपशी जोडलो गेलोभले केरळमध्ये भाजपचा एकच आमदार आहे, तरी मी पक्षाची प्रतीमा बदलण्यासाठी आणि पक्ष पुढे नेण्यासाठी भाजपशी जोडलो गेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशीदेखील आपले उत्तम संबंध होते. देशाच्या प्रती प्रेम आणि देशाच्या हितासाठी सेवा करण्याची भावना भाजपमध्ये असल्याचंही श्रीधरन यांनी नमूद केलं.भाजपसाठी सर्व धर्म समान"मी प्रत्येक मतदाराच्या हृदयात जागा निर्माण करू पाहत आहे. मला कोणतं काम करण्याची इच्छा आहे हे मी त्यांना सांगू इच्छितो. माझ्या प्रचाराची पद्धत निराळी असेल," असं निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले. भाजप सांप्रदायिक असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की भाजप सर्व धर्मांना समान रुपात पाहतो. मोदी सरकारदेखील तेच करत आहे. मी त्यांना कधीच कोणत्या अन्य धर्मावर हल्ला करताना पाहिलं नाही. भाजपवर सांप्रदायिक भेदभावाचा आरोप अयोग्य असल्याचंही श्रीधरन म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाKeralaकेरळNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी