शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

“मुख्यमंत्री ६ महिन्याने घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय”

By प्रविण मरगळे | Published: October 19, 2020 10:28 AM

BJP Mla Gopichand Padalkar Target CM Uddhav Thackeray News: केंद्र सरकारने प्रत्येक वेळेस मदत केली, कोरोना काळातही मदत केली परंतु राज्य सरकारने १ योजना दाखवावी असं आव्हान त्यांनी ठाकरे सरकारला केलं आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा धरली नाही, निर्णय घेण्याची क्षमता नाहीप्रत्येक अडचणीच्या काळात विरोधी पक्षनेते गावागावात पोहचले आहेतप्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नाही, राज्य सरकारने नुकसानीचा आढावा तरी घ्यायला हवा

बारामती – राज्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरात पोहचले आहेत, मात्र या दौऱ्यावरून विरोधी पक्ष भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते, असं असेल तर महाराष्ट्रसाठी दुर्दैव दुसरं काय नाही अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं, मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने केली पण राज्य सरकारने काय केले हे सांगावे, अतिवृष्टी झाली केंद्र मदत करेल पण राज्याने केंद्राकडे किती नुकसान झालं याचं आढावा तरी पाठवला पाहिजे, तहसिलदार पोहचत नाही, प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नाही, राज्य सरकारने नुकसानीचा आढावा तरी घ्यायला हवा, केंद्र सरकारने प्रत्येक वेळेस मदत केली, कोरोना काळातही मदत केली परंतु राज्य सरकारने १ योजना दाखवावी असं आव्हान त्यांनी ठाकरे सरकारला केलं आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते, असं असेल तर महाराष्ट्रसाठी दुर्दैव दुसरं काय नाही, शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा धरली नाही, निर्णय घेण्याची क्षमता नाही, कोणतीही अंमलबजावणी नाही, प्रत्येक अडचणीच्या काळात विरोधी पक्षनेते गावागावात पोहचले आहेत, कोरोना, चक्रीवादळ, विदर्भ पूर प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस लोकांच्या मदतीसाठी पोहचले आहेत असंही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी वाद निर्माण झाला आहे, सांगवी खुर्द येथील गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी गावात येऊन पाहणी करावी अशी आग्रही मागणी केली आहे, तर मुख्यमंत्री बोरी नदीच्या पुलावरुन पाहणी करणार असल्याचं प्रशासन म्हणत आहेत, पुलावरुन पडझड झालेली घरे आणि नुकसान कसं दिसणार? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गावात जाण्यासाठी चिखल असल्याने त्यांना पोहचता येणार नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे दौऱ्याच्या वेळी हा वाद निर्माण झाला आहे.

शरद पवारांनीही केली अतिवृष्टीची पाहणी

अतिवृष्टीमुळे गावपातळीवरील रस्ते खराब झाले त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे, अतिवृष्टीचा परिणाम ऊस पिकावरही झाला, आधी कधी आलं नाही असं संकट यंदा राज्यावर आलं. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, पंढरपूर, इंदापूर, सोलापूर याठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं,हे नुकसान भरून काढण्यासाठी कर्जाशिवाय पर्याय नाही त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यास आग्रह करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी दिली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस