शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 20:43 IST

भाजप नेत्याचा सुप्रिया सुळेंना टोला

ठळक मुद्देसीमेची दृश्य पाहून आपण भारतातच राहतो का असा प्रश्न पडल्याचं म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळेपोलिसांनी नाकारली होती आंदोलकांची भेट

दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. विदेशातील काही लोकांनीही ट्वीट करुन या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. तर, देशातील विविध राजकीय पक्षाचे नेतेही सीमारेषेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची, शेतकरी नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. आता, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि  खासदार सुप्रिया सुळेंनी गाझीपूर सीमेवर भेट दिली. मात्र, पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे, आपण नक्की भारतातच राहतो का? असा प्रश्न त्यांनी विचारलाय होता. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला."आपल्या तीर्थरुपांना जे कायदे करायचे मनात होते पण जमले नाही. ते कायदे मोदी सरकारनं करून दाखवले. तरीही विरोधासाठी विरोध करायचा असेल तर गाझीपूर सीमेवर आंदोलनकर्त्याना भेटण्यासाठी जरूर जा. परंतु तिथे त्यांना १० एकरात १०० कोटीची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या," असं म्हणत भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंवर टीका केली.काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?गाझीपूर सीमेवर विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक पक्षांचे नेते आणि खासदार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश होता. काँग्रेस शिवाय जवळपास १० विरोधी पक्षाचे १५ पेक्षा अधिक नेते पोहचले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊ दिली नाही. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटरवरुन प्रश्न विचारला होता.गाझीपूर सीमेवर दिल्ली येथे गेली ७० दिवस आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो. परंतु आम्हाला त्यांना भेटू दिले नाही. गाझीपूर सीमेचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का असा प्रश्न पडला. आपल्या संस्कृतीत 'अन्नदाता सुखी भव' असा उल्लेख आहे.पण केंद्र सरकार अन्नदात्या शेतकऱ्यांना अशी अमानुष वागणूक देत आहे, हे निषेधार्ह आहे, असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी केलं होतं.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरTwitterट्विटरSanjay Rautसंजय राऊतrakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन