शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज, तो बुडतच चाललाय"; भाजपा नेत्याची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 10:29 IST

BJP Gaurav Bhatia And Congress : भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - भाजपानेकाँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस (Congress) पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा असल्याचं म्हणत भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया (BJP Gaurav Bhatia) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर गांधी परिवाराच्या नेतृत्वावरही त्यांनी टीका केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चेमध्ये ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. चर्चेदरम्यान निवेदकाने त्यांना विचारलं की, आता तुमच्याकडे एक ताजं उदाहरण आहे. मुकूल रॉय जे आजपर्यंत तुमच्यासोबत होते ते आता पुन्हा ममता बॅनर्जींच्या बाजूला गेले आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यावर भाटिया यांनी उत्तर दिलं आहे. 

"एखाद्या पक्षाची ओळख म्हणजे त्याची विचारधारा आणि नेतृत्व असतं. भारतीय जनता पार्टीची विचारधारा स्पष्ट आहे आणि आमचं नेतृत्व म्हणजे मोदीजी देशातच नव्हे तर जगभरातलं सर्वात खंबीर नेतृत्व आहे. पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा आहे. तो बुडतच चालला आहे. बुडणार तर आहेच तो कारण राहुल गांधींच्या परिवाराव्यतिरिक्त जर कोणी उठून दिसू लागला तर त्याला दाबून टाकलं जातं, त्याला बाजूला केलं जातं. म्हणून पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू, राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट आणि समाजवादी पार्टी तर एकाच परिवारातल्या सदस्यांनी तयार झालेली आहे. अध्यक्षही त्याच परिवारातील आहेत" असं म्हटलं आहे. 

गौरव भाटिया यांनी "मुकुल रॉय यांच्याबद्दल मी म्हणेन की येथेही फरक आपल्याला दिसून येतो. जेव्हा जितिन प्रसाद काँग्रेस सोडून जातात तेव्हा मध्यप्रदेशातली काँग्रेसची शाखा म्हणते की, तो कचरा होता, कचरापेटीत गेला. पण जेव्हा मुकुल रॉय सोडून गेले, तेव्हा आम्ही अशा प्रकारचं कोणतंही विधान केलं नाही" असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) भाजपामध्ये (BJP) सामील झाले आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते हरीश रावत (Harish Rawat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक"

"जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक" असल्याचं हरीश रावत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांचा हा निर्णय न समजण्यासारख्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. "जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश करणे हे म्हणजे आमच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक आहे. हे खूपच दु:खद आणि निराश करणारं आहे. त्यांनी काँग्रेसला स्थानिक पक्ष म्हटल्याने मला आश्चर्य वाटलं. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी या पक्षाविरोधात संघर्ष केला त्यामध्येच त्यांनी प्रवेश केला हे गोंधळून टाकणारं आहे" असं हरीश रावत यांनी म्हटलं आहे. जितिन प्रसाद म्हणाले की, काँग्रेसमध्ये राहून जनतेच्या हिताचे रक्षण करणे शक्य नव्हते. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कुशल आणि खंबीर नेतृत्वाची आणि भाजपसारख्या मोठ्या संघटनेची गरज आहे. भाजपच खऱ्या अर्थाने देशातील एकमेव राजकीय पक्ष होय. आजपासून माझ्या राजकीय जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाIndiaभारतPoliticsराजकारण