शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Bihar Result: बिहारमध्ये महाआघाडीची सत्ता स्थापनेची तयारी; मात्र तेजस्वींना काँग्रेस आमदार फुटण्याची भीती

By प्रविण मरगळे | Published: November 12, 2020 4:18 PM

Bihar Result, Tejashwi Yadav, Congress, RJD News: मंत्रिमंडळात जीतनराम मांझी, मुकेश सहनी यांच्या पक्षाला किती टक्के वाटा मिळणार? याकडे महाआघाडीचे लक्ष आहे.

ठळक मुद्देनितीश कुमार यांनी विश्वासघातकी सरकार बनवलं आहे. अनेक ठिकाणी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोपबिहारमध्ये महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत, त्यात राजदने ७५ जागा जिंकल्या आहेतकाँग्रेसमुळे महाआघाडीचा विजय झाला नाही हे सत्य पक्षाने स्वीकारलं पाहिजं - काँग्रेस नेते तारिक अन्वर

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भलेही एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी पटणा येथे माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, या बैठकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आमदारांना संबोधित करताना बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार बनेल असा दावा केल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

याबाबत तेजस्वी यादवांनी आमदारांना सूचना केल्या की, पुढील महिनाभर तुम्ही सगळ्यांनी पटणामध्येच राहा. महाआघाडीतील काँग्रेसचे काही आमदार फुटण्याची भीती तेजस्वी यादव यांना आहे. त्यामुळे तेजस्वी यादव पूर्णपणे सतर्क राहत आहेत. या बैठकीत महाआघाडीचा नेता म्हणून तेजस्वी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारमध्ये राजद पाठोपाठ भाजपाला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या आहेत आणि जदयूला ४३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यातच भाजपातील काही नेते मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहेत, त्यामुळे एनडीएत काही आलबेल नसल्याने महाआघाडीला अद्यापही आशा कायम आहे.

मंत्रिमंडळात जीतनराम मांझी, मुकेश सहनी यांच्या पक्षाला किती टक्के वाटा मिळणार? याकडे महाआघाडीचे लक्ष आहे. त्यामुळे एनडीए जर काही बिनसलं तर महाआघाडी त्याचा फायदा घेत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. या बैठकीत तेजस्वी यादव म्हणाले की, जनतेने महाआघाडीला समर्थन दिलं आहे. आपल्याला जवळपास १३० जागा मिळाल्या असत्या. पण नितीश कुमार यांनी विश्वासघातकी सरकार बनवलं आहे. अनेक ठिकाणी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप तेजस्वीने केला आहे.

बिहारमध्ये महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत, त्यात राजदने ७५ जागा जिंकल्या आहेत. राजदकडून सरकारवर उमेदवारांना हरवण्याचा आरोप करण्यात येत आहे. डाव्यांना १६ जागा मिळाल्या असून महाआघाडीतील काँग्रेसच्या कामगिरीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. खुद्द काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी काँग्रेसमुळे महाआघाडीचा विजय झाला नाही हे सत्य पक्षाने स्वीकारलं पाहिजं असं म्हटलंय. तर काँग्रेसचा स्ट्राइक रेट खूप कमी राहिला, जर या जागा डावे आणि राजदा मिळाल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता अशीही चर्चा बैठकीत झाली. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवून अवघ्या १९ जागांवर विजय मिळवला आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेस