शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'अमित शहांनी स्वप्नात पाकिस्तानी सैनिक मारले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 06:58 IST

प्रकाश आंबेडकर यांची टीका

कऱ्हाड (जि. सातारा) : पाच वर्षे सत्तेत असलेल्या मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात, आम्ही पाकिस्तानचे २०० सैनिक मारले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणतात की, आम्ही एकही पाकिस्तानी सैनिक मारलेला नाही. अमित शहांनी बहुतेक स्वप्नात पाकिस्तानी सैनिक मारले असतील. गेल्या पाच वर्षांत अशाच प्रकारे खोटे बोलण्याचे काम मोदींनी केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पाकिस्तानवरील हल्ल्यात किती ठार झाले? याबाबत पंतप्रधान मोदी एक तर अमित शहा दुसरीच आकडेवारी सांगत आहेत. मात्र सुषमा स्वराज सर्जिकल स्ट्राईकमध्ये एकही सैनिक न मेल्याचे खरे बोलत आहेत. अशा खोटं बोलणाऱ्या मोदींना पुन्हा सत्तेवर बसवल्यास लुटारूंचे राज्य येईल, असे त्यांनी सांगितले.
आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे प्रथम नागरिक असतात ते जे बोलतात ते प्रत्येक भारतीयाचे मत मानले जाते. मात्र पंतप्रधान मोदी व अमित शहा हे किती खोटे बोलतात याला सीमा नाहीत. खोटारड्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच वेळ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना हे पक्ष जळालेल्या भाकरीच्या दोन बाजू आहेत. त्या करपल्या असून, त्यांचा आता काहीच उपयोग उरलेला नाही. या भाकरीवर पाणी मारण्याची हीच वेळ आहे.नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेलपुणे : शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली. मावळात नातवाला उभे केले. नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल. या शॉकमध्ये त्यांना काही झाले तर दोष माझ्यावरच यायचा, असे सांगत आंबेडकर यांनी पवारांची घराणेशाही आणि मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यांचे कार्यकर्ते अभिनंदनाचे फोन करीत असून विधानसभेच्या तिकीटांबाबत आतापासूनच विचारणा होऊ लागली आहे, असा दावा आंबेडकरांनी केला. राज्यात काँग्रेस तिसºया स्थानावर जाणार असून खरी लढाई भाजप आणि वंचित आघाडीमध्येच होणार आहे. आम्ही काँग्रेसशी भांडू, दोन हात करु पण भाजपसोबत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019satara-pcसाताराAmit Shahअमित शहाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर