शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'अमित शहांनी स्वप्नात पाकिस्तानी सैनिक मारले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 06:58 IST

प्रकाश आंबेडकर यांची टीका

कऱ्हाड (जि. सातारा) : पाच वर्षे सत्तेत असलेल्या मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात, आम्ही पाकिस्तानचे २०० सैनिक मारले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणतात की, आम्ही एकही पाकिस्तानी सैनिक मारलेला नाही. अमित शहांनी बहुतेक स्वप्नात पाकिस्तानी सैनिक मारले असतील. गेल्या पाच वर्षांत अशाच प्रकारे खोटे बोलण्याचे काम मोदींनी केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पाकिस्तानवरील हल्ल्यात किती ठार झाले? याबाबत पंतप्रधान मोदी एक तर अमित शहा दुसरीच आकडेवारी सांगत आहेत. मात्र सुषमा स्वराज सर्जिकल स्ट्राईकमध्ये एकही सैनिक न मेल्याचे खरे बोलत आहेत. अशा खोटं बोलणाऱ्या मोदींना पुन्हा सत्तेवर बसवल्यास लुटारूंचे राज्य येईल, असे त्यांनी सांगितले.
आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे प्रथम नागरिक असतात ते जे बोलतात ते प्रत्येक भारतीयाचे मत मानले जाते. मात्र पंतप्रधान मोदी व अमित शहा हे किती खोटे बोलतात याला सीमा नाहीत. खोटारड्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच वेळ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना हे पक्ष जळालेल्या भाकरीच्या दोन बाजू आहेत. त्या करपल्या असून, त्यांचा आता काहीच उपयोग उरलेला नाही. या भाकरीवर पाणी मारण्याची हीच वेळ आहे.नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेलपुणे : शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली. मावळात नातवाला उभे केले. नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल. या शॉकमध्ये त्यांना काही झाले तर दोष माझ्यावरच यायचा, असे सांगत आंबेडकर यांनी पवारांची घराणेशाही आणि मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यांचे कार्यकर्ते अभिनंदनाचे फोन करीत असून विधानसभेच्या तिकीटांबाबत आतापासूनच विचारणा होऊ लागली आहे, असा दावा आंबेडकरांनी केला. राज्यात काँग्रेस तिसºया स्थानावर जाणार असून खरी लढाई भाजप आणि वंचित आघाडीमध्येच होणार आहे. आम्ही काँग्रेसशी भांडू, दोन हात करु पण भाजपसोबत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019satara-pcसाताराAmit Shahअमित शहाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर