शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मोठा निर्णय घेण्याची काँग्रेसची तयारी, गहलोत-पायलट वाद मिटणार? की...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 3:53 PM

Gehlot vs Pilot : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा वाद सुरू आहे. मात्र हायकमांडने मनावर घेतल्याने आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली - अनेक मतभेदांनंतर पंजाबमधील कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यात काँग्रेसच्या हायकमांडने यश मिळवले आहेत. (Congress Politics)त्यानंतर आता गेल्या वर्ष दीड वर्षापासून राजस्थानकाँग्रेसमध्ये धुमसत असलेला वाद मिटवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने निर्णायक पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा वाद सुरू आहे. (Gehlot vs Pilot) मात्र हायकमांडने मनावर घेतल्याने आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. (After Punjab, now Congress is ready to take a big decision in Rajasthan, will the Gehlot-Pilot dispute end?)

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा पक्षश्रेष्ठींचा कुठलाही विचार नाही. म्हणजेच अशोक गहलोत हे मु्ख्यमंत्रिपदी कायम राहतीत. एआयसीसीच्या संघटनेत बदल होतील. त्याच प्रक्रियेंतर्गत सचिन पायलट यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवले जाऊ शकते. तसेच त्यांच्याकडे राजस्थानचा प्रभार दिला जाऊ शकतो. याशिवाय राजस्थानमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यामध्ये सचिन पायलट यांच्या मर्जीतील आमदारांना मंत्रिपद मिळू शकते. मात्र सचिन पायलट यांचे किती समर्थक मंत्री बनणार हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.

मात्र सचिन पायलट यांच्या समर्थकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल. पक्षाच्या हायकमांचे मत आहे की, बोर्ड आणि महापालिकांमध्ये पायलट आणि गहलोत गटांना महत्त्व देण्याऐवजी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना यामध्ये स्थान दिले पाहिजे. सध्या या बदलासह पक्षाला एकजूट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

दरम्यान, राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी पंजाबमध्ये कॅप्टन आणि सिद्धू यांच्यात झालेला वाद मिटवण्यात काँग्रेस हायकमांडची खूप मदत केली होती. प्रशांत किशोर हे आधीपासूनच कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करत आहेत. आता राजस्थानमधील अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादामध्येसुद्धा ते काही तोडगा काढू शकतात.

दरम्यान, पंजाब काँग्रेसमधील वाद संपुष्टात आल्यानंतर आता काँग्रेसने आपले संपूर्ण लक्ष राजस्थानवर केंद्रित केले आहे. काँग्रेस आता राजस्थानमधील वाद अधिक लांबवू इच्छित नाही. त्यामुळे दोन्ही गटांना मान्य होईल असा काही मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच या माध्यमातून दोन्ही गटांनाही फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राजस्थानमध्ये गेल्या वर्षभरापासून अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे गतवर्षी राजस्थानमधील काँग्रेस सरकारसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अशोक गहलोत यांनी सर्व अनुभव पणाला लावत या संकटावर मात केली होती. तर सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांची झोळी रिकामीच राहिली होती. तेव्हापासून राज्यातील राजकीय नियुक्त्या आणि मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटPoliticsराजकारण