शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल का?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:37 PM

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय वाटतं; वाचा जनतेचा कौल

मुंबई: दीड वर्षांपूर्वी राज्यात सत्तासंघर्ष अगदी टिपेला पोहोचला होता. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं बिनसलं. त्यानंतर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडला आणि थेट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करत राज्यात सरकार स्थापन केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण राज्यात अस्तित्वात आलेलं महाविकास आघाडी लवकरच पडणार असल्याचं भाजपच्या नेत्यांनी अनेकदा म्हटलं. मात्र दीड वर्षानंतरही महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे.ठाकरे सरकारनं कोरोना संकट योग्यपणे हाताळलं का?; राज्यातील जनता म्हणते...महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. हे सरकार अंतर्गत कलहामुळे कोसळेल. मग आम्ही राज्यातल्या जनतेला पर्याय देऊ, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा वृत्तवाहिनीनं एक सर्वेक्षण केलं. महाविकास आघाडी सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना विचारण्यात आला. त्यावर ४४ टक्के लोकांनी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असं मत नोंदवलं. तर ३० टक्के लोकांनी नाही असं मत व्यक्त केलं. तर २६ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराखाली आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा डागळली आहे का, असा प्रश्न सर्वेक्षणात सहभाग नोंदवणाऱ्यांना विचारण्यात आला. त्यावर ४३ टक्के लोकांनी होय, २९ टक्के लोकांनी नाही, तर २८ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलं. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. मात्र वाझेंविरोधातच राष्ट्रीय तपास यंत्रणेला पुरावे सापडले. त्यामुळे वाझेंना निलंबित करावं लागलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत वाझेंचं समर्थन केलं होतं. या प्रकरणामुळे गृह खात्यानं विश्वासार्हता गमावल्याचं मत ४८ टक्के जणांनी व्यक्त केलं. तर यामुळे गृह खात्यानं विश्वासार्हता गमावली नसल्याचं २५ टक्के जणांना वाटतं. तर २७ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानी