शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलची वेळच ठरतेय कर्दनकाळ

By admin | Updated: August 22, 2015 02:12 IST

अत्यंत वर्दळीच्या पुणे -मुंबई महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते यामुळे निगडी भक्ती-शक्ती चौकात शहरातील सर्वांत मोठे वाहतूक बेट तयार झाले आहे

संजय माने, पिंपरीअत्यंत वर्दळीच्या पुणे -मुंबई महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते यामुळे निगडी भक्ती-शक्ती चौकात शहरातील सर्वांत मोठे वाहतूक बेट तयार झाले आहे. सिग्नलचा चुकीचा टायमर, एकाच वेळी चारही बाजूंनी जमा होणारी वाहने यांमुळे वाहनचालक संभ्रमात पडतात. वाहतूक नियमांचे पालन करण्याची इच्छा असूनही संभ्रमात पडणाऱ्या वाहनचालकांमुळे या चौकात अपघात घडू लागले आहेत. बुधवारी दुचाकीवरून जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा बळी गेला. अशा घटना यापूर्वीही घडल्या असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक व्यवस्थेतीतील त्रुटी दूर होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले आहे. शहरातील कोणत्याही मोठ्या चौकात किमान चार वाहतूक नियंत्रक दिवे असतात. निगडीतील भक्ती-शक्ती चौक त्यास अपवाद आहे. या ठिकाणी तब्बल आठ सिग्नल आहेत. पुणे- मुंबई महामार्गाने चिंचवडकडून देहूरोडच्या दिशेने जाणारी वाहने भक्ती-शक्ती चौकात सिग्नलला थांबतात. या ठिकाणी एक सिग्नल उंचावर आहे. दुसरा समोर, परंतु थोडा दूर अंतरावर आहे. चिंचवडहून आलेल्या मोटारचालकांना उंचावरील सिग्नल दिसत नाही. समोरच्या सिग्नलचा हिरवा दिवा दिसताच, वाहनूे पुढे येतात. परंतु त्याचवेळी उंचावरील सिग्नलचा लाल दिवा लागलेला असतो. उंचावरील की समोर दिसणाऱ्या सिग्नलचा दिवा महत्त्वाचा मानायचा, हेच वाहनचालकांना कळत नाही. काही वाहने पुढे निघून जातात. तर काही त्याच ठिकाणी थांबून राहतात. चिंचवडहून देहूरोडच्या दिशेने जाण्याच्या मार्गावरील हिरवा दिवा लागल्यानंतर या मार्गाने पुढे जाऊन काही वाहने वाहतूक बेटाला वळसा घेऊन यमुनानगरच्या दिशेने जातात. ती वाहने वाहतूक बेटाला वळसा घालण्याच्या पूर्वीच देहूरोडकडून पुण्याच्या दिशने जाण्याच्या मार्गावरील सिग्नल सुरू होतो. हिरवा दिवा दिसताच वाहने मार्गस्थ होतात. सिग्नलचे टायमर यंत्रणेचे चुकीचे सेटिंग असल्याने या चौकात वाहनचालकांची गोंधळाची स्थिती निर्माण होते. थांबायचे का जायचे, हेच कळत नाही. त्यात अपघात घडू लागले आहेत. निगडी चौकात वरच्या बाजूला प्राधिकरणात जाण्यासाठी रस्ता आहे. तसेच, पुढे जाऊन वळण घेतल्यास ट्रान्सपोर्टनगरीकडे जाता येते. मुंबईहून, तसेच ट्रान्सपोर्टनगरीतून बाहेर पडणारी वाहने वाहतूक बेटाजवळून पुण्याकडे मार्गस्थ होतात. त्यामध्ये मोठे कंटेनर आणि अवजड वाहनांचा समावेश असतो. मोठी अवजड वाहने वाहतूक बेटाला वळसा पूर्ण करण्याअगोदरच सिग्नलची वेळ संपते. वळण घेताना अवजड वाहने रस्ता व्यापून टाकतात. तेवढ्यात दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरू होते. निगडी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक, तसेच वर्दळ असताना वाहतूक नियोजनासाठी पोलिसांची मात्र कमतरता जाणवते. उपलब्ध वाहतूक पोलीस आणि कर्मचारीही या चौकात लक्ष देण्याऐवजी भक्ती-शक्ती उद्यान परिसरात लावण्यात येणाऱ्या वाहनचालकांना हटकण्यात, त्यांची वाहने उचलण्यात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यात व्यस्त असतात. दर दहा मिनिटाला वाहतूक पोलिसांचे वाहन उचलण्याचे पथक या परिसरात घिरट्या मारताना दिसून येते. हातगाड्या, टपऱ्यांच्या बाजूला दुचाकी लावली की, लगेच उचलून न्यायची, वाहनचालक शोध घेत आल्यास त्याच्याकडून पैसे उकळायचे, दंडाची पावती फाडायची. यामध्ये उपलब्ध स्टाफ कायम व्यस्त असतो. हे काम वाहतूक बेटाजवळील वाहतूक नियंत्रणापेक्षा फायद्याचे असल्याने त्याच कामाला प्राधान्य दिले जात असल्याने अपघाताच्या घटनांवर नियंत्रण आणणे शक्य होत नाही.