शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

चिखलीतील आगीत हजारो बेघर! संसार जळून खाक, उपाशीपोटी कुडकुडत सारी रात्र रस्त्यावरच काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 11:38 IST

भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागल्याचे लक्षात येताच कामगार आणि चाळीत राहणारे लोक हातात सापडेल ते साहित्य घेऊन बाहेर पडले

पिंपरी : चिखलीतील कुदळवाडीमध्ये भंगार साहित्याच्या गोदामांना लागलेल्या आगीत शंभराहून अधिक शेड आणि कामगारांच्या खोल्या जळून खाक झाल्या. सोमवारी (दि. ९) सकाळी सुरू झालेल्या या अग्नितांडवाला २४ तास उलटून गेल्यानंतरही महापालिका प्रशासन बाधित नागरिकांकडे फिरकले नाही. सगळा संसार जळून खाक झाल्यामुळे हजारावर बेघरांनी लेकरा-बाळांसह थंडीत कुडकुडत रस्त्यावरच रात्र काढली.

भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागल्याचे लक्षात येताच कामगार आणि चाळीत राहणारे लोक हातात सापडेल ते साहित्य घेऊन बाहेर पडले. काहींना तर तेवढाही वेळ मिळाला नाही. जीव वाचवण्यासाठी मुलाबाळांना कडेवर घेत ते रस्त्यावर धावले. आगीत गोदामांसह संसारही खाक झाला. या अग्नितांडवानंतर प्रशासन त्यांच्यापर्यंत मदतीसाठी पोहोचले नाही. परिणामी, सोमवारची रात्र थंडीत कुडकुडत रस्त्यावरच काढावी लागली. जीव मुठीत घेऊन घरातून बाहेर धावलेल्या या बेघरांजवळ अंगावरील कपड्यांशिवाय काहीच नाही. अनेकांचे पैसेही घरात राहिले. त्यामुळे मुलाबाळांना खाऊ घालण्यासाठीही काही नाही. काही सामाजिक संस्थांनी सोमवारी दुपारी आणि रात्री दिलेल्या वडापाव-समोशांवर कसेबसे भागवल्याची कैफियत त्यांनी मांडली.

मंगळवारीही आग धुमसतच होती. संसारातील काय वाचले, हे पाहण्यासाठी महिला आणि कामगारांनी गर्दी केली होती. मात्र, प्रापंचिक साहित्याची झालेली राखरांगोळी पाहून त्यांना हुंदका अनावर होत होता. कामगारांनी उरलेसुरले साहित्य वाहनांमध्ये भरण्यास सुरुवात केली होती. अग्नितांडवानंतर दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची कोणतीच मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे कुठे राहायचे, काय खायचे, हा मोठा प्रश्न अग्नितांडवात घर-संसार गमावलेल्यांसमोर आहे.

अन्नात कालवली माती

गोदामांलगत असलेल्या खोल्यांमधील संसार पूर्णत: जळाला आहे. काही ठिकाणी भिंती कोसळल्याने घरातील धान्यात माती मिसळली आहे. अनेकांच्या धान्याच्या पिशव्या जळून खाक झाल्या आहेत. जळालेल्या धान्याच्या राखेकडे पाहत महिलांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.

दोन वर्षांची कमाई क्षणात खाक

चाळीमध्ये राहणारे अनारउल्ला यांनी दोन वर्षांपासून काम करून पैसे साठवले होते. त्यांच्या घरात मुलगी, जावई आणि ते असे तिघे राहत होते. काम करून साठवलेले पैसे त्यांनी घरात ठेवले होते. मात्र, आगीत पैशांची राख झाली.

घरे अधिकृत तरी पाडली !

गोदामांशेजारीच काही खोल्या आहेत. परवानगी घेऊन अधिकृत बांधकाम केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. याबाबत शबाना कुरेशी म्हणाल्या, ‘‘माझ्या घराला आग लागली नव्हती, ती बाजूला लागली असतानाही माझे घर पाडले. मी परवानगी घेऊन घर बांधले आहे. कराची पावती आहे. लाईट बिलदेखील भरते. प्रशासनाने अधिकृत घर पाडले, पण चौकशी करण्यासाठी कोणीच आले नाही. संपूर्ण रात्र रस्त्यावर काढली.’’

माझ्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आम्ही भाड्याने राहतो. पै-पै वाचवून जो काही संसार उभा केला होता, तो सर्व जळाला. आता आमच्याकडे काहीच शिल्लक नाही. आग लागून आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आता पुढे काय हा मोठा प्रश्न आहे. - कलिमू निसा, रहिवासी.

सात वर्षांपासून येथे राहण्यासाठी आहे. आगीत संसारातील एक भांडेसुद्धा वाचले नाही. आम्ही उघड्यावर आलो आहोत. दागिने, पैसे, कपडे सर्वच जळाले आहे. प्रशासनाने आमची सोय करावी. - मजीद कुरेशी, रहिवासी.

टॅग्स :PuneपुणेChikhliचिखलीFire Brigadeअग्निशमन दलHomeसुंदर गृहनियोजनFamilyपरिवारMuncipal Corporationनगर पालिकाMONEYपैसा