शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय घट, दुष्काळाची शक्यता; तर जगायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 16:13 IST

पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता

शिवणे मावळ : उन्हाच्या झळा गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने मावळ तालुक्यातील धरणांच्यापाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. अन्यथा पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडीवळे, कासारसाई, जाधववाडी ही शेती उद्योग व नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत.

पवना धरणात ३७.१७ टक्के पाणी

पवना धरण हे सर्वात मोठे असून त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळातील औद्योगिक वसाहती व तालुक्यातील ५० ते ६० ग्रामपंचायतींच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणात ३७.१७ टक्के पाणी शिल्लक आहे.

आंद्रा धरणात ६१ टक्के साठा

आंद्रा धरणातून तळेगाव नगरपरिषद, तळेगाव एमआयडीसी, आळंदी नगर परिषद यासह २२ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या ६१ टक्के पाणीसाठा आहे.

वडीवळेत ३७.५१ टक्के साठा

नाणे मावळातील वडीवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत, तसेच अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. बंधाऱ्यावरील व नदीवरील पाणी कमी झाल्याने सध्या पाणी सोडणे बंद आहे. मागणीनुसार सिंचन, औद्योगिक व पिण्यासाठी पाणी सोडले जाते. सध्या धरणात ३७.२१ टक्के साठा आहे.

हवामान खात्याने वर्तविली दुष्काळाची शक्यता

आगामी काळात हवामान खात्याने दुष्काळाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. पावसाळा लांबल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मावळ तालुक्यात पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी केला जातो. धरणातून तालुक्यातील ५० ते ६० ग्रामपंचायतींना पाणी योजनेला पुरवठा केला जातो. त्यानंतर शेतीसाठी व औद्योगिक वसाहतीसाठी पाणी दिले जाते.

पाणी जपून वापरा

वाढत्या उन्हामुळे व बाष्पीभवनामुळे मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. अन्यथा पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

''गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. तरीदेखील १५ जुलैपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. धरणातून दररोज ३२ दशलक्ष घटफूट पाणी सोडले जाते. - अशोक शेटे, उपविभागीय अभियंता, पवना धरण''

टॅग्स :PuneपुणेmavalमावळDamधरणWaterपाणीFarmerशेतकरीRainपाऊस