शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय घट, दुष्काळाची शक्यता; तर जगायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 16:13 IST

पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता

शिवणे मावळ : उन्हाच्या झळा गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने मावळ तालुक्यातील धरणांच्यापाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. अन्यथा पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडीवळे, कासारसाई, जाधववाडी ही शेती उद्योग व नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत.

पवना धरणात ३७.१७ टक्के पाणी

पवना धरण हे सर्वात मोठे असून त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळातील औद्योगिक वसाहती व तालुक्यातील ५० ते ६० ग्रामपंचायतींच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणात ३७.१७ टक्के पाणी शिल्लक आहे.

आंद्रा धरणात ६१ टक्के साठा

आंद्रा धरणातून तळेगाव नगरपरिषद, तळेगाव एमआयडीसी, आळंदी नगर परिषद यासह २२ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या ६१ टक्के पाणीसाठा आहे.

वडीवळेत ३७.५१ टक्के साठा

नाणे मावळातील वडीवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत, तसेच अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. बंधाऱ्यावरील व नदीवरील पाणी कमी झाल्याने सध्या पाणी सोडणे बंद आहे. मागणीनुसार सिंचन, औद्योगिक व पिण्यासाठी पाणी सोडले जाते. सध्या धरणात ३७.२१ टक्के साठा आहे.

हवामान खात्याने वर्तविली दुष्काळाची शक्यता

आगामी काळात हवामान खात्याने दुष्काळाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. पावसाळा लांबल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मावळ तालुक्यात पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी केला जातो. धरणातून तालुक्यातील ५० ते ६० ग्रामपंचायतींना पाणी योजनेला पुरवठा केला जातो. त्यानंतर शेतीसाठी व औद्योगिक वसाहतीसाठी पाणी दिले जाते.

पाणी जपून वापरा

वाढत्या उन्हामुळे व बाष्पीभवनामुळे मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. अन्यथा पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

''गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. तरीदेखील १५ जुलैपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. धरणातून दररोज ३२ दशलक्ष घटफूट पाणी सोडले जाते. - अशोक शेटे, उपविभागीय अभियंता, पवना धरण''

टॅग्स :PuneपुणेmavalमावळDamधरणWaterपाणीFarmerशेतकरीRainपाऊस