शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय घट, दुष्काळाची शक्यता; तर जगायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 16:13 IST

पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता

शिवणे मावळ : उन्हाच्या झळा गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने मावळ तालुक्यातील धरणांच्यापाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. अन्यथा पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडीवळे, कासारसाई, जाधववाडी ही शेती उद्योग व नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत.

पवना धरणात ३७.१७ टक्के पाणी

पवना धरण हे सर्वात मोठे असून त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळातील औद्योगिक वसाहती व तालुक्यातील ५० ते ६० ग्रामपंचायतींच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणात ३७.१७ टक्के पाणी शिल्लक आहे.

आंद्रा धरणात ६१ टक्के साठा

आंद्रा धरणातून तळेगाव नगरपरिषद, तळेगाव एमआयडीसी, आळंदी नगर परिषद यासह २२ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या ६१ टक्के पाणीसाठा आहे.

वडीवळेत ३७.५१ टक्के साठा

नाणे मावळातील वडीवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत, तसेच अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. बंधाऱ्यावरील व नदीवरील पाणी कमी झाल्याने सध्या पाणी सोडणे बंद आहे. मागणीनुसार सिंचन, औद्योगिक व पिण्यासाठी पाणी सोडले जाते. सध्या धरणात ३७.२१ टक्के साठा आहे.

हवामान खात्याने वर्तविली दुष्काळाची शक्यता

आगामी काळात हवामान खात्याने दुष्काळाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. पावसाळा लांबल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मावळ तालुक्यात पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी केला जातो. धरणातून तालुक्यातील ५० ते ६० ग्रामपंचायतींना पाणी योजनेला पुरवठा केला जातो. त्यानंतर शेतीसाठी व औद्योगिक वसाहतीसाठी पाणी दिले जाते.

पाणी जपून वापरा

वाढत्या उन्हामुळे व बाष्पीभवनामुळे मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. अन्यथा पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

''गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. तरीदेखील १५ जुलैपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. धरणातून दररोज ३२ दशलक्ष घटफूट पाणी सोडले जाते. - अशोक शेटे, उपविभागीय अभियंता, पवना धरण''

टॅग्स :PuneपुणेmavalमावळDamधरणWaterपाणीFarmerशेतकरीRainपाऊस