शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले ‘त्यांच्या’ वैवाहिक जीवनात विष! एकाच घरात पूर्ण वेळ एकत्र राहूनही पती-पत्नीकडे एकमेकांसाठी नाही वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 09:37 IST

पोलिसांचा भरोसा सेल कडे २०३ तक्रारी

 

नारायण बडगुजर

पिंपरी : लॉकडाऊनमध्ये संपूर्ण कुटुंबाला घरामध्ये रहावे लागले. त्यामुळे किरकोळ कारणावरून विसंवाद होऊन वादाचे प्रकार घडले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. यात काही पती-पत्नीमंधील टोकाचा वाद झाल्याने त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. एक प्रकारे त्यांच्या वैवाहिक जीवनात विष कालवल्याचा प्रकार या दिवसांमध्ये झाल्याचे दिसून येते. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या भरोसा सेलकडे पती-पत्नींकडून तक्रारींचे अर्ज दाखल केले जातात. कौटुंबिक वाद होऊन नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. एरवी कामानिमित्त जास्तीतजास्त घराबाहेर राहणारे पती-पत्नी तसेच कुटुंबातील इतर सदस्य लॉकडाऊनमध्ये पूर्णवेळ एकत्र आले. यातून काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले. तसेच घरातील कामे कोणी करायची, किती करायची, स्वयंपाक, चहा, कॉफी, नाश्ता अशा किरकोळ कारणांवरून सुरू झालेली भांडणे विकोपाला जात असल्याचे दिसून येते. सासू-सूनेमध्ये बेबनाव हे देखील वादाचे कारण ठरत आहे. अशा प्रकरणांमध्ये दाखल झालेल्या अर्जांबाबत कार्यवाही करून पोलिसांच्या भरोसा सेलकडून समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातत. त्यासाठी पती-पत्नी तसेच त्यांच्या घरच्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतरही समझोता न झाल्यास संबंधित पती-पत्नी पुढील कायदेशीर मार्ग अवलंबतात.

 

५२ पती-पत्नींचे भांडण सोडविले

लॉकडाऊन काळात भरोसा सेलने ५२ पती-पत्नींमध्ये समझोता घडवून आणला. मात्र त्यासाठी मोठी कसरत करावी लागली. लॉकडाऊन तसेच कोरोना महामारीमुळे अर्जदार तसेच इतर संबंधित लोक समुपदेशनसाठी येण्याचे टाळतात. तक्रारदारांनी अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष भेटण्यास तयार होत नसल्याचे प्रकार घडत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन निर्बंधांचे पालन करून भरोसा सेलला समुपदेशन करावे लागले. 

 

मोबाइल, सोशल मीडिया हेच कारण

लॉकडाऊनमुळे पूर्ण वेळ एकत्र राहात असले तरी त्यातील जास्तीतजास्त वेळ मोबाइल व सोशल मीडियाचा वापर करून घरातील इतर सदस्यांना वेळ देत नसल्याचे कारण तक्रार पती-पत्नींकडून अर्जात नमूद केले आहे. सतत ऑनलाइन राहणे, वर्क फ्राॅम होम असूनही ऑनलाइन कॉलमध्ये जास्त वेळ गुंतून राहणे, अशी कारणे सांगून काही महिलांनी त्यांच्या पतीची तक्रार केली. यात काही पुरुषांनीही त्यांच्या पत्नीबाबत अशाच तक्रारी केल्या. त्यामुळे एकत्र राहूनही एकमेकांना पूर्ण वेळ देऊ न शकल्याने वाद झाले. 

 

पैसा हेच कारण

लॉकडाऊन काळात अनेक हातांचे काम गेले. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला. परिणामी आर्थिक विवंचना होऊन कुटुंब अडचणीत आले. यात काही जणांना त्यांच्या सवयी, राहणीमान बदलणे अवघड होत आहे. त्यामुळे चिडचिड वाढून पती-पत्नीमध्ये वादाचे प्रकार झाले. पैसा नसणे, हेच कारण सांगत त्यांच्याकडून विभक्त होण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 

नातेवाईकांचा अनावश्यक हस्तक्षेप

लॉकडाऊनमुळे सर्व कुटुंब एकत्र आल्याने त्यांच्यातील उणीवा देखील प्रकर्षाने एकमेकांच्या समोर आल्या. सुनेला स्वयंपाक येत नाही, वेळेवर चहा, नाश्ता दिला नाही, अशी कारणे सांगून सासू-सासऱ्यांकडून जाच होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच सासरचे मोबाइलवर बोलू देत नाहीत, पगाराचे पैसै मागतात, अशी कारणे सुनांकडून तक्ररी करण्यात आला. 

भरोसा सेलकडून मार्च २०२० पासून आलेल्या एकूण तक्रारी - २०३

दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात आलेल्या तक्रारी - ५९

टॅग्स :PoliceपोलिसDivorceघटस्फोटSocial Mediaसोशल मीडियाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस