- सचिन ठाकरपवनानगर - पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुडंमळा येथे दि.१५ जून रोजी झालेल्या पुल दुर्घटनेमधील चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक पर्यटक जखमी झाले होते.पुणे जिल्हा्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दि.१७ जून रोजी दुपारी रुग्णालयात जाऊन दुर्घटनेत जखमी झालेल्या पर्यटकांची व इंद्रायणी नदीवरील कुडंमळा येथील झालेल्या दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन दुर्घटनेत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,आमदार सुनील शेळके, मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले,तहसीलदार विक्रम देशमुख,आरोग्य अधिकारी शँरन सोनवणे,तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थितीत होते.
यावेळी अजित पवार यांनी बोलतांना सांगितले कि कुडंमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यांची घटना दुर्दैवी असून यामधील मृत पावलेल्याच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत जाहीर केली आहे. यावेळी जे पर्यटक जखमीं झाले आहे. त्याचा हि खर्च शासन करत आहे. यामध्ये जे जे कोण दोषी असतील त्याची चौकशी सुरू केली असून त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्या वर कडक कारवाई करणार असल्याचे यांनी सांगितले आहे.