शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांना आस पालखी रिंगण सोहळ्याची

By admin | Updated: July 7, 2015 04:18 IST

चार वर्षांपूर्वी श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील नेत्रदीपक आणि भव्य असा रिंगण सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना पुन्हा या सोहळ्याचा योग कधी येणार

पिंपरी : चार वर्षांपूर्वी श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील नेत्रदीपक आणि भव्य असा रिंगण सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना पुन्हा या सोहळ्याचा योग कधी येणार, याची आस लागली आहे. वाढीव तिथी आल्यानंतरच संस्थान पिंपरीत रिंगण सोहळा घेत असते. मात्र, हा योग दर वर्षी यावा, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. आषाढी वारीतील रिंगणसोहळा म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. दिवसभराच्या प्रवासानंतर थकलेल्या भाविकांचा उत्साह वाढविण्यासाठी रिंगण सोहळ्याचे आयोजन केले जाते. गोल व उभे असे रिंगणाचे दोन प्रकार आहेत. देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर एकूण सहा रिंगण होतात. गोल रिंगणात सर्वप्रथम दोन्ही अश्व पालखी रथासोबत रिंगणात प्रदक्षिणा करून मध्यभागी येतात. पालखी रथातून उतरवून मध्यभागी ठेवली जाते. त्यानंतर टाळकरी, झेंडेकरी, तुळशी घेतलेल्या महिला, वीणेकरी रिंगण घालतात. त्यानंतर अश्वांचे रिंगण पार पडते. रिंगणात धावणारे अश्व पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. देहूतून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिले गोल रिंगण सणसरजवळील बेलवडी येथे पार पडते. पुणे-पिंपरी-चिंचवड शहरापासून बेलवडीचे अंतर सुमारे शंभर किलोमीटर आहे. शहरातील प्रत्येकाला येथील रिंगण सोहळा पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण पिंपरीतील रिंगणाची आतुरनेते वाट पाहतात. मात्र, वाढीव तिथी आली, तरच पिंपरीत रिंगण घेता येते. पालखी सोहळ्याचा कार्यक्रम मराठी महिन्याप्रमाणे आणि तिथीनुसार असतो. दर वर्षी ज्येष्ठ वद्य सप्तमीला पालखी देहूतून प्रस्थान ठेवते. तसेच अमावास्येला बारामतीत पोहोचते. हा कार्यक्रम दर वर्षी ठरलेला आहे. मात्र, अमावास्येपूर्वी एखादी वाढीव तिथी आल्यास एक दिवस अधिकचा मिळतो. याच वाढीव तिथीनुसार २०१० व २०११ या वर्षी पिंपरीत मुक्काम घेण्यात आला. मुक्कामाच्या ठिकाणीच एचए मैदानावर रिंगण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. एचए मैदानावर अक्षरश: एक गावच वसले होते. लागोपाठ दोन वर्षे शहरवासीयांसाठी ती एक पर्वणीच ठरली होती. आबालवृद्धांनी हा नयनरम्य सोहळा डोळ्यांत साठवून ठेवला. आवडीने महिलांसह पुरुषांनी वारकऱ्यांच्या पोशाखात रिंगण सोहळ्याला हजेरी लावत हा सोहळा अनुभवला. या सोहळ्यालाही भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. असाच सोहळा पुन्हा व्हावा, अशी शहरवासीयांची इच्छा आहे. पालखीचा मुक्काम आणि रिंगण सोहळा यामुळे पिंपरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक घरासमोर रांगोळी, भगवी पताका उभारली होती. प्रत्येकाने आपआपल्या परीने वारकऱ्यांची सेवा केली. निवासासाठी घरातील खोली, पटांगण वारकऱ्यांना उपलब्ध करून दिले. जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच, वारकऱ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, परिसर अस्वच्छ होवू नये यासाठी अनेकांनी आपल्या घरातील स्वच्छतागृहदेखील वारकऱ्यांना वापरण्यासाठी दिले होते.