शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पोलीस म्हणून आले...तिघांचे अपहरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 7:01 PM

उत्तर प्रदेश येथील पोलीस आहोत न्यायालयात हजर राहण्यासाठी तिघांना तत्काळ घेऊन जाण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देहिंजवडी पोलिसांकडे आरोपींविरोधात गुन्हा दाखल हिंजवडी पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता तिघांवर गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट

पिंपरी : बावधन येथील पाटीलनगर येथे पोलीस असल्याची बतावणी करून एक महिला, पाच वर्षांचे बालक आणि एकजण अशा तिघांचे रविवारी दुपारी अपहरण करण्यात आले. राहत्या घरातून तिघांना पळवून नेण्याचा प्रकार घडला. दोन दिवस शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता व्यकतींचा शोध न लागल्याने २५ वर्षीय महिलेने सोमवारी हिंजवडी पोलिसांकडे दोन संशयित आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस म्हणून आलेल्या एख महिला व एक पुरुष यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलभ रतन (वय २७), रोमा सिंग (वय २६) आणि दर्श (वय ५) अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत. रोमा सिंग हिचे पहिले लग्न झाले आहे. पहिल्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला असून त्यानंतर तिने निलब याच्याशी लग्न केले. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक चार ते पाचजण पोलिसांच्या वेशात आले. उत्तर प्रदेश येथील पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश येथे रोमा सिंग आणि निलब यांच्यावर न्यायालयात दावा सुरु असल्याचे कारण सांगून न्यायालयात हजर राहण्यासाठी तत्काळ घेऊन जाण्यासाठी आल्याचे त्यांनी नमूद केले. रोमा सिंग आणि निलब तसेच पाच वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांना बळजबरीने मोटारीत बसवुन ते घेऊन गेले. याबाबत निलभ यांच्या बहिणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हिंजवडी पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता,रामा सिंग आणि निलब यांच्यावर संबंधित पोलिसांकडे गुन्हा दाखल नसल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच त्यांच्यावर न्यायालयात दावा सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस असल्याची बतावणी करून तिघांचे अपहरण केले असल्याचा संशय बळावला आहे. पोलीस वेशात आलेले ते नेमके कोण होते. त्यांनी या तीन लोकांचे अपहरण का केले या सगळ््या प्रश्नांच्या उत्तरासह हिंजवडी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrimeगुन्हाKidnappingअपहरणUttar Pradeshउत्तर प्रदेश