Sunstrock: कडक उन्हामुळे कलिंगडची मागणी वाढली, लिंबाचेही दर वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 09:25 AM2022-04-08T09:25:06+5:302022-04-08T09:43:34+5:30

उन्हाचा कडाका वाढल्याने शहरातील रस्ते भरदुपारी निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचाव म्हणून नागरिक रूमाल, स्कार्फ, दुपट्ट्यांचा वापर करत आहेत.

देशात काही दिवसांपासून सुरु असलेली उष्णतेची लाट कायमच असून, सूर्य प्रखरतेने तळपत असल्याने मंगळवारी जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात करण्यात आली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सियस कमाल तापमानासह मंगळवारी अकोला जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले.

नायझर देशातील बिर्नी एन कोन्नी (४४ अंश सेल्सियस) दुसरे सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे. टॉप पाच शहरांमध्ये पाकिस्तानमधील नवाबशाह व नायझर देशातील एनगुल्ग्मी व टिलाबेरी या शहरांचा समावेश आहे.

मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू असलेली उष्णतेची लाट एप्रिल महिन्यात आणखीन तीव्र झाली आहे. गत आठवडाभरापासून अकोला शहराचे तापमान ४३ अंशांच्या वरच राहिले आहे.

अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तप्त झळा असह्य होत असल्याने नागरिक घरातच राहणे पसंत करत आहेत. तर, कोल्ड्रींक्स, आणि उन्हाळी फळांचा जोर वाढला आहे.

कलिंगडची मागणी वाढली असून थंडगार कलिंगड खाण्यासाठी नागरिक उत्सुक दिसून येतात. त्यासोबतच द्रांक्षेही बाजारात तेजीत दिसत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सिझनमध्ये हा आस्वाद नागरिक घेत आहेत.

दुसरीकडे शीतपेय आणि विविध कोल्ड्रींक्सचाही खप वाढला आहे. पारंपरिक लिंबू शरबतचे स्टॉलही जागोजागी दिसून येत आहेत.

नेहमीप्रमाणे उन्हाळ्यात लिंबाचे भाव वधारले असून सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचाही परिणाम लिंबांच्या भावावर झाला आहे.

गतवर्षी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे लिंबांच्या बागेचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे, यंदा लिंबांची चांगलीच दरवाढ पाहायला मिळत आहे.

गुजरातच्या सुरत मार्केटमध्ये लिंबू 200 ते 250 रुपये किलोने विकले जात आहेत. मुंबईतही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे