पाकिस्तानने भारताची ६ लढाऊ विमाने पाडली? सीडीएस अनिल चौहान यांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:53 IST2025-05-31T17:43:47+5:302025-05-31T17:53:17+5:30
Operation Sindoor : पाकिस्तानने भारताचे सहा लडाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे.

Operation Sindoor : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी अमेरिकन वृत्तवाहिनी ब्लूमबर्गला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानची पोलखोल केली.
'पाकिस्तानने भारताचे ६ लढाऊ विमान पाडले आहेत, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला होता. आता भारताचे सीडीएस यांनी पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
सीडीएस अनिल चौहान यांनी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात भारतीय विमानांचे नुकसान मान्य केले. पण त्यांनी किती विमानांचे नुकसान झाले हे सांगितले नाही.
सीडीएस अनिल चौहान हे शांगरी येथे संवादात सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले आहेत. विमानांच्या नुकसानीच्या प्रश्नावर सीडीएस म्हणाले की, विमानांचे नुकसान का झाले हे शोधणे अधिक महत्त्वाचे आहे, जेणेकरून सैन्य आपली रणनीती सुधारू शकेल आणि नंतर प्रत्युत्तर देऊ शकेल.
अनिल चौहान म्हणाले की, 'आम्हाला आमच्या रणनीतिमध्ये चुका समजल्या, ज्या आम्ही दुरुस्त केल्या आणि दोन दिवसांनी अंमलात आणल्या. आम्ही पुन्हा आमची सर्व विमाने लांब अंतरावर लक्ष्य करून उडवली.'
शांगरी येथे संवादादरम्यान सीडीएस अनिल चौहान म्हणाले की, आम्ही सतत बनावट बातम्यांना तोंड देण्याचा प्रयत्न केला. सशस्त्र दलांचा १५% वेळ त्या बनावट बातम्यांना तोंड देण्यात घालवला आहे. भारताने नेहमीच आपले विचार भक्कम पायावर उभे केले आहेत.
'या ऑपरेशन्समध्ये थेट सहभागी असल्याने, मी असे म्हणू शकतो की सायबरने संघर्षात भूमिका बजावली, पण त्याचा प्रभाव मर्यादित होता.' या ऑपरेशन दरम्यान पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी चुकीची माहिती पसरवल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली होती.