CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 04:40 PM2020-08-14T16:40:47+5:302020-08-14T16:55:45+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील दहा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून रुग्णांचा मृत्यू देखील होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे.

कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारताने ब्राझील आणि रशियालाही मागे टाकले आहे. यामध्ये जगात भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

देशातील दहा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून रुग्णांचा मृत्यू देखील होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.

देशातील रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 24,61,191 वर गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (14 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 64,553 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1007 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 48 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,61,595 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 17,51,556 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, भारत कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिकेतील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.

कोरोनाच्या क्रमावारीत याआधी ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आता भारताने आता त्याला मागे टाकले आहे. देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे.

कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा सातत्याने वाढत आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत अनेकांना आला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा या राज्यात कोरोनाने कहर केला असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य खबरदारी घेतली जात आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे.

कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत 21,100,842 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत तब्बल 758,012 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 13,949,117 लोकांनी कोरोनाचं युद्ध जिंकलं असून ते बरे झाल्याची माहिती मिळत आहे.