CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाची लढाई लवकरच जिंकता येणार; 'हे' औषध प्रभावी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 06:56 PM2020-06-03T18:56:03+5:302020-06-03T19:11:14+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 64 लाखांवर गेला आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे.

जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा साडे तीन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 64 लाखांवर गेला आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे.

भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या वर गेली आहे. तर पाच हजारांहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.

कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.

भारतात आणखी एक औषधं ही कोरोना व्हायरला टक्कर देत असल्याची माहिती समोर आली आली आहे. रेमडेसिवीर हे औषध कोरोनावर उपयुक्त असल्याचं म्हटलं जात आहे.

भारतात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर या औषधाला परवानगी देण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (Drugs Controller General of India) ही मंजुरी दिली आहे.

अमेरिकेतील गिलियड सायन्स कंपनीचं हे औषध आहे. एबोलासाठी हे औषध तयार करण्यात आलं, जे आता कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचं दिसून आलं आहे.

अमेरिकेनंतर आता भारतातही रेमडेसिवीर हे औषध वापरलं जाणार आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांनाही हे औषध दिलं जाणार आहे.

सामान्यपणे रुग्णांना दहा दिवस हे औषध दिलं जातं मात्र भारतात फक्त 5 दिवस या औषधाचा डोस मर्यादित ठेवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे. यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला. तर यापैकी 50 टक्के म्हणजेच तब्बल 1 लाख 303 लोक कोरोनातून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.

वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 382,709 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,463,647 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.