भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:30 IST2025-06-12T17:13:12+5:302025-06-12T17:30:29+5:30
Ahmedabad Plane Crash: भारतात अनेक असे विमानतळ आहेत, जिथे अनुभवी वैमानिकांनाही विमान उतरवणे आव्हानात्मक आहे.

Ahmedabad Plane Crash: भारतात प्रवाशांना सेवा देणारे अनेक विमानतळ आहेत. यापैकी काही विमानतळांवर मोठ्या व्यावसायिक विमानांसाठी प्रशस्त धावपट्टी आहे, तर काहींमध्ये कॉम्पॅक्ट धावपट्टी आहे. ही छोटी विमानतळे दुर्गम भागांना जोडतात. विशेष म्हणजे, अनुभवी वैमानिकांसाठीही या लहान धावपट्टींवर विमान उतरवणे आव्हानात्मक असते. आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही धोकादायक धावपट्टींबद्दल सांगणार आहोत.
बाल्जेक विमानतळ: मेघालयातील बाल्जेक विमानतळाची धावपट्टी फक्त 3,300 फूट (1,006 मीटर) आहे, ज्यामुळे ही देशातील सर्वात लहान आणि दोकादायक धावपट्टींपैकी एक आहे. 2008 मध्ये उद्घाटन झालेले हे विमानतळ डोर्नियर 228 सारख्या लहान विमानांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. पण, अद्याप हे कार्यान्वित झालेले नाही.
कुल्लू-मनाली विमानतळ: हिमालयाच्या मध्यभागी असलेले हे विमानतळ भुंतर विमानतळ म्हणूनही ओळखले जाते. येथील धावपट्टीची लांबी 3,691 फूट (1,125 मीटर) आहे. हे विमानतळ त्याच्या आव्हानात्मक लँडिंगसाठी प्रसिद्ध आहे.
शिमला विमानतळ: याला जुब्बरहट्टी विमानतळ असेही म्हणतात. हे हिमाचलमधील शिमलापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर आहे. 3691 फूट (1,125 मीटर) धावपट्टी लांबीसह, या प्रादेशिक विमानतळाला अनेक ऑपरेशनल अडचणींचा सामना करावा लागला आहे.
गग्गल विमानतळ : हिमाचल प्रदेशातील कांग्रा येथे असलेल्या गग्गल विमानतळाची धावपट्टी ही खूप धोकादायक मानली जाते. 1200 एकर परिसरात बनलेल्या या विमानतळाची धावपट्टी 2 हजार 492 फूट उंचावर आहे. येथे विमान उतरवताना झालेली लहानशी चूकसुद्धा मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते.
अगाट्टी विमानतळ: लक्षद्वीप द्वीपसमूहातील अगाट्टी बेटावर स्थित विमानतळाची धावपट्टी लांबी 4,235 फूट (1,291 मीटर) आहे. लक्षद्वीप बेटांना सेवा देणारे एकमेव विमानतळ म्हणून, या दुर्गम प्रदेशाला भारतीय मुख्य भूमीशी जोडण्यात ही सुविधा महत्त्वाची भूमिका बजावते.
लेंगपुई विमानतळ: मिझोराममधील लेंगपुई विमानतळाची धावपट्टी ही पर्वताच्या माध्यावर आहे. ही धावपट्टी समुद्रसपाटीपासून 2500 मीटर उंचावर आहे. हा विमानतळ भारतातील तीन टेबलटॉप विमानतळांपैकी एक आहे. विशेष बाब म्हणजे हा विमानतळ नद्यांच्या संगमावर आहे.
कुशोक बाकुला रिमपोची विमानतळ: लडाखमधील कुशोक बाकुला रिमपोची विमानतळावर विमान उतरवणे हे कुठल्याही आव्हानापेक्षा कमी नाही, हा विमानतळ सर्वात जास्त उंचावर असल्याने जगात खूप चर्चित आहे. या विमानतळावरील धावपट्टी तब्बल 3 हजार 259 मीटर उंचावर आहे. येथे धावपट्टी वगळता इतरत्र केवळ बर्फ आणि पर्वतच दिसतात.
पाक्कीम विमानतळ : 2018 मध्ये सिक्कीमला आपला पहिला विमानतळ मिळाला होता. हे विमानतळ टेबलटॉप प्रकराचे आहे. येथील धावपट्टी समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूट उंचावर असलेल्या पाकयोंग गावाजवळ एका पर्वतावर आहे. हे विमानतळ 201 एकर परिसरात पसरलेले आहे.
बालुरघाट विमानतळ: पश्चिम बंगालमध्ये स्थित बालुरघाट विमानतळाची धावपट्टी लांबी 4,905 फूट (1,495 मीटर) आहे. या विमानतळाला मोठा इतिहास आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिशांनी याचा वापर केला होता.
वीर सावरकर विमानतळ (पोर्ट ब्लेअर, अंदमान): अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी एका बेटावर आहे. ही धावपट्टी चहुबाजूंनी हिरवळीने आच्छादलेला आहे. त्यामुळे येथे विमान उतरवणे वैमानिकांसाठी आव्हानात्मक ठरते. येथे विमान उतरवणे खूप कठीण मानले जाते. कारण जेव्हा विमान खूप खाली येते तेव्हाच येथील धावपट्टी नजरेस पडते.