शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वेळीच व्हा सावध ! जाणून घ्या जेवण न करण्याचे दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 3:37 PM

1 / 9
1.धावपळीच्या आयुष्यात आपल्याला बऱ्याचदा जेवणासाठी वेळच मिळत नाही. तर अनेकदा काही किलो वजन घटवण्याच्या नादात आपण मुद्दाम जेवण टाळतो. पण, या सवयीची तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
2 / 9
2. लक्ष्य केंद्रीत होत नाही : ग्लुकोजच्या मदतीनं आपल्या मेंदूचे कार्य सुरू असते. यामुळे योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण न जेवल्यास रक्तातील साखरेची पातळी खालावते आणि आपण आपले लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता गमावू शकता.
3 / 9
3. चिडचिड होते : बऱ्याचदा भुकेमुळे आपली जास्त चिडचिड होते, हा अनुभव प्रत्येकानं घेतला असेलच. रक्तातील साखरेची पातळी खालावल्यानं मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो. तुमची मनःस्थिती मिनिटा-मिनिटाला बदलते. पोटात जेवण न गेल्यानं काहींना प्रचंड राग येतो, चिडचिड होते तर अस्वस्थही वाटते.
4 / 9
4. प्रमाणाबाहेर खाणे : वेळच्या वेळेत जेवण न झाल्यानं बरेच जण दिवसा अखेरीस प्रमाणाबाहेर खाणे पोटात ढकलतात. भूक असताना खाद्यपदार्थ पोटात न गेल्यास अनेकांना नंतर भूक न लागण्याचा आजार होऊ शकतो. तर काही जणांना प्रमाणाबाहेर खाण्याची सवय लागते. त्यामुळे वजन घटवण्याचा कितीही प्रयत्न केल्यास तुमच्या प्रयत्नांना यश येणार नाही.
5 / 9
5. वजन वाढते : वेळेत जेवण न करण्याचा वाईट परिणाम तुमच्या चयापचय प्रक्रियेवरही होऊ शकतो. याची मोठी किंमत तुमच्या शरीरालाच चुकवावी लागते. चयापचय प्रक्रियेवर परिमाण झाल्यानं फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.
6 / 9
6. चक्कर येणे : भुकेले राहिल्यानं अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.
7 / 9
7.तणाव येणे : भुकेल्या अवस्थेत असताना आपल्या शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे आपल्याला तणाव जाणवू लागतो.
8 / 9
8. अन्य आजारांना आमंत्रण : जेवण सोडल्यानं कोणतीही शारीरिक समस्या निर्माण होणार नाही, असे तुम्हाला वाटत असल्यास तो तुमचा गैरसमज आहे. वजन घटवायचं असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतरानं खात राहा
9 / 9
9.योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार आणि व्यायाम करणंच तुम्हाला मदत करू शकेल.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स