Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण काळात गरोदर महिलांसाठी मोबाईलचा वापर ठरेल हानिकारक; डॉक्टरचाही इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 02:44 PM2022-04-29T14:44:15+5:302022-04-29T14:53:37+5:30

३० एप्रिल रोजी वर्षातील पहिले आंशिक सूर्यग्रहण जगातील अनेक भागांमध्ये दिसणार आहे. ही घटना ब्लॅक मून नावाच्या आणखी एका खगोलीय हालचालीला टक्कर देत आहे आणि नासाच्या म्हणण्यानुसार, ३० एप्रिल रोजी ब्लॅक मून काही काळ सूर्यप्रकाश रोखेल. हे सूर्यग्रहण दुपारी १२.१५ पासून दिसणार आहे.

भारतामध्ये सूर्यग्रहणाबाबत अनेक कथा आणि समजुती आहेत, ज्या गर्भवती महिलांच्या बाबतीत अधिक व्यापक आहेत. अशा अनेक गोष्टींबद्दल तुम्हीही ऐकले असेल. असे मानले जाते की ग्रहणकाळात गर्भवती महिलेने अनेक विशेष गोष्टी करणे टाळावे कारण त्याचा तिच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो.

भारतातील ग्रहण काळात गर्भवती महिलांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो आणि जर कुणी महिला या वर्षाच्या पहिल्या आंशिक सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती असेल तर अशा महिलांना या गोष्टींची देखील जाणीव असायला हवी.

सूर्यग्रहणाबाबत असे म्हटले जाते की, गरोदर महिलांनी यावेळी मोबाईल फोन वापरू नये कारण त्याचे हानिकारक रेडिएशन बाळाला हानी पोहोचवू शकते. हे खरोखर घडते की नाही हे याबाबत डॉक्टर काय सल्ला देतात याबाबत जाणून घेऊया.

नोएडा येथील क्रिएशन वर्ल्ड आयव्हीएफ सेंटरच्या वैद्यकीय संचालक डॉ शुची कालिया म्हणतात की, ग्रहण काळात गर्भवती महिलांनी मोबाईल फोन वापरण्याबाबत कोणतेही संशोधन झालेले नाही. मात्र, मोबाईलमधून असे रेडिएशन बाहेर पडतात, जे न जन्मलेल्या बाळासाठी घातक ठरू शकतात, हे नाकारता येत नाही.

म्हणूनच, गर्भवती महिलेने केवळ ग्रहण काळातच नव्हे तर संपूर्ण गर्भधारणेदरम्यान मोबाईल फोनचा वापर कमी केला तर चांगले होईल. डॉक्टर शुची यांनी सांगितले की, जेव्हा ग्रहण होते तेव्हा सूर्याच्या किरणोत्सर्गात बदल होतो, जे गरोदर आई आणि मुलासाठी हानिकारक असू शकते, त्यामुळे त्यांनी यावेळी सावधगिरी बाळगली पाहिजे.

यासोबतच डॉक्टर शुची हेही सांगतात की, आमच्याकडे असे कोणतेही संशोधन नाही ज्यामध्ये असे म्हटले आहे की ग्रहणकाळात मोबाईल वापरल्याने मुलाचे नुकसान होते किंवा त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अशा परिस्थितीत कोणतीही दंतकथा किंवा गैरसमजूत न करता सावधगिरी आणि खबरदारी घेण्यावर भर दिला पाहिजे. डॉक्टर शुची यांच्या मते, गर्भवती महिलेने ग्रहण काळात असे कोणतेही काम करणे टाळावे ज्यामुळे बाळाला हानी पोहोचू शकते.

साध्या शब्दात सांगायचे तर डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांचेही म्हणणे आहे की, संशोधनाच्या अभावामुळे ग्रहणकाळात मोबाईल वापरणे हानिकारक आहे की फायद्याचे हे स्पष्टपणे सांगता येत नाही. मात्र काळजी घेणे गरजेचे आहे.

सावधगिरी म्हणून गर्भवती महिलेने मोबाईल आणि इतर गोष्टींपासून दूर राहणे चांगले. मोबाईल फोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन मुलासाठी चांगले नाही, त्यामुळे त्यापासून अंतर ठेवण्यात गैर काहीच नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.