२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:08 IST
1 / 15भारतात अनेक मंदिरे अशी आहेत की, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्भूत उत्सवांमध्ये केवळ स्थानिक नाही, तर देश-परदेशातून भाविक आवर्जून उपस्थिती लावत असतात. यापैकी एक म्हणजे ओडिसा पुरी येथील जगन्नाथ मंदिर. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा अद्भूत परंपरा आणि समृद्ध संस्कृतीचा एक सर्वोत्तम आदर्श असल्याचे मानले जाते. शुक्रवार, २७ जून २०२५ रोजी आषाढ शुद्ध द्वितीयेला जगन्नाथ पुरी रथयात्रा आहे. 2 / 15ओडिशातील पुरी शहर हे सप्तपुरींपैकी एक आहे आणि त्याला पृथ्वीचे वैकुंठ देखील म्हटले जाते. जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर आणि तांत्रिक शक्तीपीठांचे मुख्य केंद्र, विमला शक्तीपीठ, येथे आहे. गेल्या काही दिवसांपासून भविष्यातील घटनांबाबत अनेक भाकिते केली जात आहे. जगभरात असलेली अशांतता, अस्थिरता यामुळे काही प्रमाणात भीतीचे वातावरण असल्याचे म्हटले जाते. 3 / 15प्राचीन काळी भगवान विष्णू जगन्नाथ मंदिरात नीलमाधव स्वरूपात विराजमान होते. कालांतराने हे ठिकाण श्रीविष्णूंचे आठवे अवतार भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान बनले. जगन्नाथ मंदिर हे सर्वात चमत्कारिक मंदिर मानले जाते. येथील प्रत्येक घटना भविष्याचे संकेत देते, असा दावा केला जातो. दरवर्षी, आषाढ महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला भगवान जगन्नाथाची जगप्रसिद्ध रथयात्रा निघते.4 / 15जगन्नाथांचा अपमान: भगवान जगन्नाथांचा अपमान केला जातो, तेव्हा मंदिराच्या परंपरांमध्ये गोंधळ निर्माण होतो, असे म्हटले जाते. जगन्नाथ मंदिरात नवकलेवर विधी केला जातो. या विधीमध्ये जुन्या मूर्ती बदलून नवीन मूर्ती बसवल्या जातात. असे म्हटले जाते की, १९९६ नंतर २०१५ मध्ये या विधीवरून पुजाऱ्यांमध्ये भांडण झाले. त्यामुळे या विधीला विलंब झाला. ओडिशातील जनता याला भगवान जगन्नाथांचा अपमान आणि परंपरा मोडणे असे मानतात.5 / 15घुमटाचा दगड: जगन्नाथ पुरी मंदिराच्या घुमटातून दगड खाली पडतील. असे म्हटले जाते की, १८४२ पासून आतापर्यंत जगन्नाथ पुरीतून दगड पडण्याची घटना सुमारे १५ ते १६ वेळा घडली आहे. ही बाब शुभ मानली जात नाही. 6 / 15वडाचे झाड: ओडिशातील चक्रीवादळामुळे जगन्नाथ मंदिरातील कल्पवृक्ष किंवा पवित्र वडाचे झाड पडेल आणि त्यानंतर जगात लाखो लोक मरतील, असा दावा केला. मे २०१९मध्ये ओडिशात चक्रीवादळ आले, ज्यामध्ये हे वडाचे झाड कोसळले. १९९९ च्या अखेरीस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि हजारो लोकांचा मृत्यू झाला.7 / 15ध्वज पडणे: जगन्नाथ मंदिराचा ध्वज अनेक वेळा पडला आहे. चक्रीवादळामुळे तर ध्वज समुद्रातही पडला आहे. मे २०१९ मध्ये चक्रीवादळामुळे ही घटना घडली आहे. त्यानंतर मे २०२० मध्येही ही घटना घडली आहे.8 / 15नीलचक्र तिरके होणे: चक्रीवादळामुळे जगन्नाथ मंदिराचे नीलचक्र किंवा सुदर्शन चक्र तिरके होईल, असा दावा केला गेला होता. मे २०१९ मध्ये चक्रीवादळामुळे हे विशाल चक्र काहीसे तिरके झाले होते.9 / 15ध्वजाला आग लागणे: जगन्नाथ पुरीच्या मंदिराच्या ध्वजाला आग लागेल, असा दावा केला गेला होता. १९ मार्च २०२० रोजी एकादशीच्या दिवशी मंदिराच्या आवारात महादीप प्रज्वलित करण्यात आला. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे ध्वज महादीपजवळ उडाला आणि त्याला आग लागली. त्यानंतर पाच दिवसांनी देशात पहिला लॉकडाऊन लागू करण्यात आला. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतमुळे भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. 10 / 15त्रिदेवाचे कपडे: मंदिर परिसरात त्रिदेवावर असलेल्या कापडाला आग लागेल, असा दावा केला गेला होता. मंदिर परिसरातही ही घटना अनेक वेळा घडली आहे.11 / 15घुमटावर गिधाडाचे बसण: मंदिराच्या शिखरावर आणि एका स्तंभावर गिधाड बसेल, असा दावा केला जात होता. असे म्हटले जाते की, जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर कधीही कोणताही पक्षी उडताना दिसला नाही किंवा त्याभोवती कोणतेही विमान किंवा हेलिकॉप्टर उडवले गेले नाही. परंतु जुलै २०२० मध्ये आणि नंतर डिसेंबर २०२१ मध्ये मंदिराच्या वर गिधाडे, गरुड दिसले. हे पक्षी मंदिराच्या शिखरावर, ध्वजावर, एका स्तंभावर आणि नीलचक्रावर बसलेले दिसले.12 / 15रक्ताचे डाग: जगन्नाथ मंदिरात वारंवार रक्ताचे डाग दिसतील, असा दावा केला गेला. ही घटना घडली आहे. मंदिर परिसरात वारंवार रक्ताचे डाग आढळत आहेत. कधीकधी मारामारीमुळे तर कधीकधी इतर काही गूढ कारणामुळे रक्ताचे डाग दिसतात. अनेक वेळा मंदिर शुद्ध केले गेले आहे आणि महान विधी केले गेले आहेत.13 / 15याच भविष्य मालिकेत असेही म्हटले आहे की, जेव्हा शनि मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा भारतासाठी वाईट काळ सुरू होईल. अडीच वर्षे अराजकता राहील. आताच्या घडीला शनि मीन राशीत असून, अडीच वर्षांनी मेष राशीत प्रवेश करेल.14 / 15या भविष्यवाणीनुसार या विश्वावर भारताची अधिसत्ता असेल आणि त्याचा राजा एक योगीपुरुष असेल. ती व्यक्ती आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करून विश्वाला शांततेचा संदेश देईल. रशियातून शेकडो लोक जगन्नाथजींच्या दर्शनासाठी येतील आणि भरपूर सोने अर्पण करतील. ओडिशात एक लोककथा आहे की २०२४ ते २०३३ या काळात जगातील प्रत्येक गोष्ट बदलेल.15 / 15- अशा प्रकारचे दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.