शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

टरबूज, खरबूज, भाजीपाला उत्पादकांचे १० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST

गंगाखेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह परजिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद राहिल्या. परिणामी ४ हजार हेक्टरवरील काढणीस आलेले ...

गंगाखेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह परजिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद राहिल्या. परिणामी ४ हजार हेक्टरवरील काढणीस आलेले टरबूज, खरबजू, भाजीपाला बाजारपेठ अभावी जागेवरच सडून जात आहे. त्यामुळे गंगाखेड तालुक्यातील या शेतकऱ्यांचे १० काेटींहून अधिकचे नुकसान झाले आहे. याकडे राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गंगाखेड तालुक्यातून इतर शहरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी टरबूज, खरबूज व भाजीपाल्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे कमी दिवसांमध्ये जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून सरसावले आहेत. त्यामुळे याहीवर्षी शेतकऱ्यांनी १ हजार ५०० हेक्टरवर टरबूज, खरबूज आणि २ हजार ५०० हेक्टरवर वांगे, टोमॅटो, मिरची, पालक, गाजर, चुका आदी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील बाजारपेठा ठप्प पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करून काढणीस आलेला भाजीपाला बाजारपेठ अभावी जागीच सडून जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे राज्य शासनाने या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देऊन पंचनामा करत आर्थिक नुकसान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अर्ध्या एकर शेतामध्ये टोमॅटो, वांग्यांची लागवड केली. या पिकांवर मोठा खर्च केला. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद आहेत. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. परिणामी मोठा फटका सहन करावा लागत आहे.

बाळासाहेब राठोड, भाजीपाला उत्पादक शेतकरी