शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वरपूडकर तर उपाध्यक्षपदी गोरेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने अध्यक्षपदासाठी सकाळी ११ ...

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने अध्यक्षपदासाठी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे आ. सुरेश वरपूडकर व प्रेरणा वरपूडकर यांचा आणि विरोधी बोर्डीकर गटाकडून हिंगोलीचे माजी खा. शिवाजी माने यांचा अर्ज दाखल झाला. छाननीत शिवाजी माने यांचा अर्ज अवैध ठरला तर निश्चित केलेल्या वेळेत अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज प्रेरणा वरपूडकर यांनी मागे घेतला. त्यामुळे आ. सुरेश वरपूडकर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी वरपूडकर गटाकडून हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे राजेश पाटील-गोरेगावकर तर बोर्डीकर गटाकडून भगवानराव सानप यांचा अर्ज दाखल झाला. यावेळी सानप यांनी त्यांचा अर्ज परत घेतला. त्यामुळे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अध्यक्षपदी आ. वरपूडकर व उपाध्यक्षपदी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली.

राष्ट्रवादीच्या पक्ष निरीक्षकांच्या भूमिकेने वातावरण पलटले

भाजपचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांना विमा घोटाळा प्रकरणात जिल्हा बँकेत जाण्यास न्यायालयाने एका आदेशान्वये बंदी घातली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करण्याच्या अनुषंगाने बँकेत जाण्यास परवानगी मागणारा अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बोर्डीकर यांनी दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे बोर्डीकर गटात सोमवारी निराशेचे वातावरण होते. काठावर असलेले संख्याबळ आणखी कमी झाल्याने मतांची जुळवाजुळव होणे, या गटास अशक्य वाटत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यावरच या गटाची पूर्ण दारोमदार होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची नियुक्ती केली. दांडेगावकर यांनी मंगळवारी सकाळीच राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांची परभणीत बैठक घेतली तसेच पक्षाचे सर्व सदस्य महाविकास आघाडीसाेबतच राहतील, असे वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगितले. त्यामुळे बैठकीस उपस्थित आ. दुर्राणी हे नाराज होऊन पाथरीला निघून गेले. परिणामी बोर्डीकर गटाचे बँकेचे सत्ता मिळविण्याचे मनसुबे धुळीस मिळाले.