शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूकीमुळे रापमची एसटी मालामाल; चालक मात्र कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून वारंवार संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागत ...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून वारंवार संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागत आहे. यावर उपाय म्हणून एसटीने प्रवासी वाहतुकीबरोबरच व्यावसायिक माल वाहतुकीलाही सुरुवात केली आहे. सध्या परभणी विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारांमध्ये २५ मालवाहतूक बस आहेत. या मालवाहतूक बसमधून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढीस हातभार लागत आहे. २२ मार्च २०२० ते २७ मे २०२१ या कालावधीत २५ बसेसच्या माध्यमातून १ हजार ८६२ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. त्यासाठी २ लाख २९ हजार २४४ किमीचे अंतर कापण्यात आले आहे. यातून एसटी महामंडळाला ९३ लाख ७० हजार ८१५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, मालवाहतूक बस घेऊन जाणाऱ्या चालकांना परजिल्ह्यामध्ये दोन ते तीन दिवस मुक्काम करावा लागतो. त्यासाठी एसटी महामंडळाकडून कोणतीही सुविधा पुरवण्यात आलेली नाही. उलट स्वखर्चातून दोन ते तीन दिवसांची बस चालकाला गुजराण करावी लागते. त्यामुळे एकीकडे संचारबंदीच्या काळात माल वाहतुकीतून एसटी मालामाल होत असली तरी चालक मात्र कंगाल होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देऊन चालकांना मोफत राहण्याची व खाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

कोरोना काळात ९४ लाख रुपयांची कमाई

मागील वर्षभरापासून परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातही आगारांतील प्रवासी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे एसटी महामंडळ मालवाहतूक बसमधून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. वर्षभराच्या कालावधीत १ हजार ८६२ फेऱ्या मालवाहतूक बसने पूर्ण केल्या आहेत. त्यामधून २ लाख २९ हजार २०६ किमीचे अंतर पार केले आहे. यातून प्रतिकिमी ४०.८७ प्रमाणे ९३ लाख ७० हजार ८१५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या मालवाहतूक बसने संचार बंदीच्या काळात वर्षभरात ९४ लाख रुपयांची कमाई केली आहे.

परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम

सध्या मध्यवर्ती कार्यालयाप्रमाणे जिल्हास्तरावर मालवाहतुकीसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्याच्यावर जिल्ह्यातील मालवाहतुकीची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये कृषी, अन्न प्रक्रिया केलेल्या मालासह अन्य महामंडळांच्या गोदामातील मालाची वाहतूक प्राधान्याने करण्यात येते. सध्या बाजारामध्ये असलेल्या मालवाहतुकीच्या दराप्रमाणे एसटी आपले दर आकारत आहे. या मालवाहतुकीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काही दिवसांपासून ही मालवाहतूक चालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. परजिल्ह्यातून माल घेऊन गेलेली गाडी पाच ते सहा दिवस परत येत नाही. त्या ठिकाणावरून लवकर माल मिळत नसल्याने अडचण निर्माण होत निर्माण होत आहे. त्यामुळे चालकांनाही परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत संबंधित आगारात मुक्काम ठोकावा लागतो. त्यासाठी लागणारा खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागत आहे.

ॲडव्हान्स मिळतो. मात्र, पगारातून होतो कट

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयअंतर्गत येणाऱ्या ७ आगारांमधून मालवाहतूक केली जाते. तसेच इतर जिल्ह्यात गेल्यानंतर परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत संबंधित चालकाला त्या ठिकाणी थांबावे लागते. त्यासाठी एसटी महामंडळाकडून ५०० च्या पटीत ॲडव्हान्स दिला जातो. मात्र, ॲडव्हान्सची रक्कम आगामी पगारामधून कपात केली जाते. त्यामुळे संचारबंदीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या चालकांना एसटी महामंडळाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे दिसून येत आहे.