शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांत एक हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:16 IST

मानवत : येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर गेल्या १५ दिवसांत १ हजार ६१ क्विंटल हरभऱ्याची हमीदराने खरेदी करण्यात आली ...

मानवत : येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर गेल्या १५ दिवसांत १ हजार ६१ क्विंटल हरभऱ्याची हमीदराने खरेदी करण्यात आली आहे. मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. सद्यस्थितीत खुल्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून, शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मात्र ५ हजार १०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हरभरा विक्रीसाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्राला प्राधान्य देत आहेत. १५ फेब्रुवारीपासून खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात शेतकऱ्यांची हरभरा विक्रीच्या दृष्टिकोनातून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली. २० मार्चपर्यंत तब्बल २ हजार ७० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी १ हजार २५० शेतकऱ्यांची प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी केंद्रावर आणण्याकरिता एसएमएस पाठविण्यात येत आहेत. १९ मार्चपर्यंत ६०० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी १०६ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या १५ दिवसांत १ हजार ६१ क्विंटल हरभरा येथील केंद्रावर आणून विकला आहे. दुसरीकडे ऑनलाईन नोंदणीसाठी सात-बारा, बँक पासबुक, आधारकर्ड, पीक पेरा आदी कागदपत्रांची आवश्यकता असल्याने व पैशांसाठीही विलंब लागत असल्याने काही शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे हरभऱ्याची विक्री केली आहे. मानवतच्य बाजारात ५ हजार क्विंटल हरभरा खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. विशेष म्हणजे खासगी व्यापाऱ्यांचा दर हमीभावापेक्षा कमी असतानाही शेतकऱ्यांचा कल या व्यापाऱ्यांकडेच दिसून येत आहे.

सोयाबीनची खरेदी शून्यावर

मागील आठवड्यात बाजार समितीच्या यार्डात सोयाबीनची आवक वाढल्याचे पाहावयास मिळाले. या आठवड्यात मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. हमीभाव केंद्रावर १५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यामध्ये फक्त १६३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यापैकी ५३ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. मात्र एकाही शेतकऱ्याने आपला माल विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर आणला नाही. दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांना मात्र तब्बल ५० हजार क्विंटल सोयाबीनची विक्री करण्यात आली आहे. परिणामी हमीभाव खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या सोयाबीनची प्रतीक्षा लागली आहे.