शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

परभणी: भिंतीचे दगड ढासळल्याने येलदरी धरणाला धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:59 IST

मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी होणे गरजेचे झाले आहे. मात्र जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी होणे गरजेचे झाले आहे. मात्र जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.येलदरी येथे १९६८ साली धरण बांधकाम करण्यात आले. मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी हे एक धरण आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने या धरणाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झुडूपे वाढली आहेत, दगड ढासळत आहेत. त्यामुळे भविष्यात हे धरण १०० टक्के भरले तर मातीच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र याचे गांभीर्य जलसंपदा विभागाला राहिलेले नाही. येलदरी धरणाची परिस्थिती सध्या हे धरण बेवारस झाले आहे. सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाची तज्ज्ञांकडून पाहणी करण्याची आवश्यकता आहे.सुरक्षा विभागाच्या शिष्टमंडळाचा अहवाल गुलदस्त्यात४नाशिक येथील धरण सुरक्षा विभागाच्या एका शिष्टमंडळाने तीन महिन्यांपूर्वी या धरणाची पाहणी केली होती. धरण परिसरातील अति महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून हा अहवाल जलसंपदा विभागाला सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु, पाहणीनंतर या अहवालाचे काय झाले? हे अद्याप समजले नाही.४या पाहणीत धरणाची दगडी भिंत, मातीच्या भिंतीची पाहणी केली होती. मातीच्या भिंतीच्या आतून पाझरणारे पाणी योग्य प्रमाणात आहे किंवा नाही, धरणाचा मुख्य गाभा व्यवस्थित आहे का? पावसाळ्यात कोणती कामे करावी लागतील, याचा आढावा शिष्टमंडळाने घेतला होता.पूर्णवेळ : अधिकारी मिळेना४मागील पाच ते सहा वर्षापासून या प्रकल्पासाठी एकही पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नाही. नियमित कर्मचारीही नाहीत. एकेकाळी शंभरहून अधिक कर्मचारी असणाऱ्या या धरणावर आता बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारी आहेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे दुरुस्तीची कामे ठप्प आहेत. याशिवाय वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे होत नसल्याने धरणाचे मोठे नुकसान होत आहे. पुरेशी वीज व्यवस्था, सुरक्षारक्षक या सुविधा उपलब्ध नसल्याने हे धरण आजमितीला बेवारस झाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प