शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

परभणी: भिंतीचे दगड ढासळल्याने येलदरी धरणाला धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:59 IST

मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी होणे गरजेचे झाले आहे. मात्र जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी होणे गरजेचे झाले आहे. मात्र जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.येलदरी येथे १९६८ साली धरण बांधकाम करण्यात आले. मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी हे एक धरण आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने या धरणाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झुडूपे वाढली आहेत, दगड ढासळत आहेत. त्यामुळे भविष्यात हे धरण १०० टक्के भरले तर मातीच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र याचे गांभीर्य जलसंपदा विभागाला राहिलेले नाही. येलदरी धरणाची परिस्थिती सध्या हे धरण बेवारस झाले आहे. सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाची तज्ज्ञांकडून पाहणी करण्याची आवश्यकता आहे.सुरक्षा विभागाच्या शिष्टमंडळाचा अहवाल गुलदस्त्यात४नाशिक येथील धरण सुरक्षा विभागाच्या एका शिष्टमंडळाने तीन महिन्यांपूर्वी या धरणाची पाहणी केली होती. धरण परिसरातील अति महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून हा अहवाल जलसंपदा विभागाला सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु, पाहणीनंतर या अहवालाचे काय झाले? हे अद्याप समजले नाही.४या पाहणीत धरणाची दगडी भिंत, मातीच्या भिंतीची पाहणी केली होती. मातीच्या भिंतीच्या आतून पाझरणारे पाणी योग्य प्रमाणात आहे किंवा नाही, धरणाचा मुख्य गाभा व्यवस्थित आहे का? पावसाळ्यात कोणती कामे करावी लागतील, याचा आढावा शिष्टमंडळाने घेतला होता.पूर्णवेळ : अधिकारी मिळेना४मागील पाच ते सहा वर्षापासून या प्रकल्पासाठी एकही पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नाही. नियमित कर्मचारीही नाहीत. एकेकाळी शंभरहून अधिक कर्मचारी असणाऱ्या या धरणावर आता बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारी आहेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे दुरुस्तीची कामे ठप्प आहेत. याशिवाय वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे होत नसल्याने धरणाचे मोठे नुकसान होत आहे. पुरेशी वीज व्यवस्था, सुरक्षारक्षक या सुविधा उपलब्ध नसल्याने हे धरण आजमितीला बेवारस झाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प