शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

परभणी : पूर्णेवरील पाणीटंचाईचे संकट अखेर टळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पूर्णा  ( परभणी ) : बारा दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून पूर्णा कोल्हापुरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा  (परभणी) : बारा दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून पूर्णा कोल्हापुरी बंधाऱ्यात २७ डिसेंबर रोजी पाणी धडकणार असल्याची माहिती नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांनी दिली.पूर्णा नदीपात्रात कोल्हापुरी बंधाºयात अडविलेले पाणी शहरासाठी वापरले जाते. एकदा बंधारा पूर्ण भरल्यानंतर चार महिने शहराला पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; परंतु, नादुरुस्त दरवाजे व बंधाºयाच्या तळभागातून होणाºया पाणी गळतीमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. यामुळे चार महिने पुरणारे पाणी हे दोन ते अडीच महिन्यातच संपते. बंधाºयात पाणीसाठा शिल्लक नसल्याने ऐन हिवाळ्यात शहरात बारा दिवसांपासून नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता. बंधाºयात पाणी नसल्याने शहरातील खाजगी व सार्वजनिक हातपंपांनी तळ गाठला आहे. पाणीपातळी खोलवर गेल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे पाणी रोटेशन तसेच नादुरुस्त बंधाºयाचे दरवाजे बदलून नवीन दरवाजे टाकण्याबाबत मागणी केल्यानंतर २३ डिसेंबर रोजी सिद्धेश्वर धरणातून परभणी व पूर्णा शहरासाठी पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यत पूर्णा कोल्हापुरी बंधाºयात ०.५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बारा दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरवासियांना पाणी मिळणार आहे.बहुतांश हातपंप पडले बंद४पाणीटंचाईच्या काळात पर्याय म्हणून पालिकेद्वारे प्रत्येक प्रभागात हातपंपांची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु, अनेक हातपंप पाणी नसल्याने कोरडे पडले आहेत. तर बहुतांश हातपंप दुरुस्तीअभावी बंद आहेत. बंद पडलेले हातपंप दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.बंधारा दुरुस्त करण्याची मागणी४पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा हा पूर्णपणे नादुरुस्त आहे. या बंधाºयाच्या तळ भागातून व दरवाजातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते.४याबाबत पालिका प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जातो; परंतु, संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.४पूर्णा येथील बंधाºयाची दुरुस्ती केली तर दुष्काळात पाण्याचा अपव्यय थांबविणे शक्य होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईDamधरण