शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

परभणी : पूर्णेवरील पाणीटंचाईचे संकट अखेर टळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पूर्णा  ( परभणी ) : बारा दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून पूर्णा कोल्हापुरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा  (परभणी) : बारा दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून पूर्णा कोल्हापुरी बंधाऱ्यात २७ डिसेंबर रोजी पाणी धडकणार असल्याची माहिती नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांनी दिली.पूर्णा नदीपात्रात कोल्हापुरी बंधाºयात अडविलेले पाणी शहरासाठी वापरले जाते. एकदा बंधारा पूर्ण भरल्यानंतर चार महिने शहराला पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; परंतु, नादुरुस्त दरवाजे व बंधाºयाच्या तळभागातून होणाºया पाणी गळतीमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. यामुळे चार महिने पुरणारे पाणी हे दोन ते अडीच महिन्यातच संपते. बंधाºयात पाणीसाठा शिल्लक नसल्याने ऐन हिवाळ्यात शहरात बारा दिवसांपासून नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता. बंधाºयात पाणी नसल्याने शहरातील खाजगी व सार्वजनिक हातपंपांनी तळ गाठला आहे. पाणीपातळी खोलवर गेल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे पाणी रोटेशन तसेच नादुरुस्त बंधाºयाचे दरवाजे बदलून नवीन दरवाजे टाकण्याबाबत मागणी केल्यानंतर २३ डिसेंबर रोजी सिद्धेश्वर धरणातून परभणी व पूर्णा शहरासाठी पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यत पूर्णा कोल्हापुरी बंधाºयात ०.५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बारा दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरवासियांना पाणी मिळणार आहे.बहुतांश हातपंप पडले बंद४पाणीटंचाईच्या काळात पर्याय म्हणून पालिकेद्वारे प्रत्येक प्रभागात हातपंपांची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु, अनेक हातपंप पाणी नसल्याने कोरडे पडले आहेत. तर बहुतांश हातपंप दुरुस्तीअभावी बंद आहेत. बंद पडलेले हातपंप दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.बंधारा दुरुस्त करण्याची मागणी४पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा हा पूर्णपणे नादुरुस्त आहे. या बंधाºयाच्या तळ भागातून व दरवाजातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते.४याबाबत पालिका प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जातो; परंतु, संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.४पूर्णा येथील बंधाºयाची दुरुस्ती केली तर दुष्काळात पाण्याचा अपव्यय थांबविणे शक्य होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईDamधरण