शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

परभणी : जांबवासियांनी केला निर्धार; गाव बनविणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 10:48 PM

सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला फाटा देत गाव एकत्र आले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय तालुक्यातील जांब बु. येथील ग्रामस्थांनी दाखविला आहे. संपूर्ण गावामध्ये जलसंधारणाची कामे करून गाव जलसाक्षर बनविण्याचा निर्धार जांब बु. येथील ग्रामस्थांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला फाटा देत गाव एकत्र आले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय तालुक्यातील जांब बु. येथील ग्रामस्थांनी दाखविला आहे. संपूर्ण गावामध्ये जलसंधारणाची कामे करून गाव जलसाक्षर बनविण्याचा निर्धार जांब बु. येथील ग्रामस्थांनी केला आहे.मागील अनेक वर्षापासून जांब बु. या गावामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिंतूर तालुक्यात सुरु असलेल्या पाणी फाऊंडेशन या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ सहभाग न नोंदविता गावातील आबाल-वृद्धांनी या चळवळीत श्रमदान केले. गावामध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सीसीटी, अर्दन स्ट्रक्चर यासह जलसंधारणाची अनेक कामे श्रमदानातून पूर्ण केली.ग्रामस्थांच्या श्रमदानाला सलाम करीत तालुक्यातील अनेक नागरिकांनी, सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांनी प्रतिसाद दिला. यामध्ये कर्मचारीवर्ग, विविध सामाजिक संस्था, व्यापारी यांनीही खारीचा वाटा उचलला. सर्वात महत्त्वाचे या श्रमदानासाठी लागणारी जेसीबी मशीन अनुलोम या सामाजिक संघटनेने जांबवासियांना उपलब्ध करून दिली. या जेबीसी मशीनसाठी लागणाºया डिझेलसाठी प्रशासन व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मदत केली.विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील जांब बु. या गावाने पाणी फाऊंडेशन उपक्रमांतर्गत येणाºया सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये गतवर्षी या स्पर्धेेत हे गाव जिल्ह्यात प्रथम आले. एवढ्यावरच हे ग्रामस्थ न थांबता यावर्षीही त्यांनी जलसंधारणाची कामे सुरूच ठेवली आहेत. या गावामध्ये झालेली जलसंधारणाची कामे पंचक्रोशीसह जिल्ह्यात आदर्श निर्माण करणारी ठरत आहेत. विशेष म्हणेज या श्रमदानामध्ये गावातील नवयुवक पुढे सरसावले असून त्यांना ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळत आहे. सामाजिक संस्थांची मदत व प्रशासनाचा हातभार यावर हे गाव लवकरच जिल्ह्यामध्ये जल बँक तयार करणारे गाव म्हणूून विकसित होताना दिसून येत आहे.पहिल्याच पावसात साचले पाणीसततच्या निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जांब बु. ग्रामस्थांनी गतवर्षीपासून पाणी फाऊंडेशन उपकेंद्रांतर्गत श्रमदान करीत गाव पाणीदार बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गतवर्षी व यावर्षी जलसंधारणांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मान्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसात खळखळून पाणी वाहिले. श्रमदान करुन उभारलेल्या बंधाºयामध्येही पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानाचे चिज झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा