शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

परभणी: येलदरी धरणासह पूर्णा नदी कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:16 IST

पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असतानाही जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरण अद्यापही ज्योत्याखाली आहे. त्याचबरोबर या धरणाखाली असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही भर पावसाळ्यात कोरडेठाक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह पिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असतानाही जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरण अद्यापही ज्योत्याखाली आहे. त्याचबरोबर या धरणाखाली असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही भर पावसाळ्यात कोरडेठाक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह पिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. त्यामुळे यावर्षी मृगनक्षत्रात शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यानंतर २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते. मात्र या नक्षत्रात देखील पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शेवटी जुलै महिन्यात एका सर्वसाधाण झालेल्या पावसाच्या भरोशावर शेतकºयांनी आपल्या पेरण्या आटोपल्या. मात्र ६ जुलैपासून लागलेल्या पूनर्वसू नक्षत्राने देखील शेतकºयांची निराशा केली. त्यामुळे शेतकºयांचे डोळे सध्या आकाशाकडे लागले आहेत. तीन महत्त्वाचे नक्षत्र संपत आले आहेत. तरीही येलदरी व परिसरात एकही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत.येलदरी धरणही यावर्षी मृतसाठ्यात असून या परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे धरणाखालील पूर्णा नदीचे पात्र भर पावसाळ्यात कोरडेठाक असल्यामुळे जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी शिल्लक नाही. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने या परिसरातील नदी, नाले, ओढे खळखळून वाहिले नाही. त्यामुळे जनावरांना पाणी पाजावे तरी कोठे? हा प्रश्न पशूपालकांसमोर उभा राहिला आहे. खरीप हंगामात पेरणी केलेले बी उगवले खरे. मात्र पाण्याअभावी हे अंकूर कोमेजून जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.तीन कोल्हापुरी : बंधाºयात थेंबही नाही४येलदरी धरणाखालील पूर्णा नदीच्या पात्रात तीन कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र या बंधाºयात आजमितीस एकही पाण्याचा थेंब शिल्लक नाही. परिणामी या परिसरातील पंचवीसहून अधिक गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.४सध्या या बंधारा पात्रात जे काही पाणी शिल्लक आहे, ते पाणी खराब झाल्यामुळे या पाण्यातून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे येलदरी परिसरात मुसळधार पाऊस होऊन बंधाºयात नवीन पाणीसाठा तयार होईपर्यंत या परिसरातील शेतकºयांना वाट पहावी लागणार आहे.२३ दलघमीने कमी झाला पाणीसाठा४जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणामध्ये १ जूनपर्यंत ११.८३४ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. सध्या या धरणामध्ये ४४६.०९० मीटर पाणीपातळी आहे. यामध्ये १०१.५५९ दलघमी एकूण पाणीसाठा आहे. ० दलघमी जीवंत पाणीसाठा आहे.४गतवर्षीच्या तुलनेत १७६ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. या धरणातील पाणीसाठाही गतवर्षी मृतसाठ्यात होता. यावर्षी तर धरणातील मृत पाणीसाठ्यात देखील २३ दलघमी पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.४सध्या तरी या भागातील नागरिक सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पRainपाऊसriverनदी