शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

परभणी : पालमच्या शेतकऱ्यांनी फिरवली शेडनेटकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:10 IST

निसर्गाच्या लहरीपणाला कंठाळलेल्या शेतकºयांनी शासनाकडून अनुदानावर संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेटसाठी अर्ज केले होते; मात्र निवड झालेल्या शेतकºयांनी दुष्काळामुळे शेडनेट उभारणीकडे पाठ फिरवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): निसर्गाच्या लहरीपणाला कंठाळलेल्या शेतकºयांनी शासनाकडून अनुदानावर संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेटसाठी अर्ज केले होते; मात्र निवड झालेल्या शेतकºयांनी दुष्काळामुळे शेडनेट उभारणीकडे पाठ फिरवली आहे.पालम तालुक्यात तालुका कृषी कार्यालयाकडून यावर्षीच्या उद्दिष्टानुसार ६ शेडनेट उभारणीसाठी मंजुरी दिली आहे. १२५ शेतकºयांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेटसाठी आॅनलाईन प्रस्ताव दाखल केले होते.शेतकºयांमध्ये चुरस निर्माण झाल्याने कृषी विभागाने सोडत पद्धतीने शेतकºयांची प्रतीक्षा यादी तयार केली होती. पिकांची पेरणी केल्यानंतर कृषी विभागाने शेतकºयांना शेडनेट उभारणीसाठी पूर्वसंमती दिली. यावर्षी शेडनेट उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. विशेष म्हणजे, दुष्काळामुळे फारसे उत्पादन हाती लागले नाही. शेडनेटसाठी बँकाही कर्ज देत नाहीत. शेडनेट उभारणीसाठी केवळ ६ ते १३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.पदरमोड करीत शेतकºयांना अगोदर पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे शासनाची योजना घेण्यापेक्षा त्याकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. पहिल्या टप्प्यात सहा शेतकºयांना पूर्वसंमती देण्यात आली होती. त्यातील तीन जणांनी शेडनेट उभारणी होणार नाही, असे कळविले आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील पुढील शेतकºयांना पूर्वसंमती देण्यात आली आहे.यातही कोणीही शेतकरी धजावत नाही. त्यामुळे शासनाची योजना कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण आहे.१०० टक्के अनुदान द्या४सध्या पालम तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पहिल्याच यादीमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामामधील पेरणीवर केलेला खर्च दुष्काळात वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकºयांना राज्य शासन व कृषी विभागाने मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या शेडनेट या योजनेवर १०० टक्के अनुदान देऊन प्रत्येक शेतकºयाच्या शेतामध्ये शेडनेटची उभारणी करावी. जेणेकरुन ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध आहे, ते शेतकरी दुष्काळाचा सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.अनुदानासाठीही माराव्या लागतात चकरा४कृषी विभाग शेतकºयांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असला तरी पालम तालुक्यातील कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या अनास्थेचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. शेतकºयांनी एखादी योजना आपल्या शेतात अंमलात आणली तर त्या योजनेसाठी शासनाकडून मिळणाºया अनुदानासाठी शेतकºयांना कमीत कमी सहा महिने कृषी विभागाकडे चकरा माराव्या लागतात. त्यामुळे स्वत: जवळील पैशांची गुंतवणूक करुन शासनाकडून मिळणाºया अनुदानासाठी चकरा मारण्यापेक्षा योजनेकडेच पाठ फिरवावी लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी