शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

परभणी : पालमच्या शेतकऱ्यांनी फिरवली शेडनेटकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:10 IST

निसर्गाच्या लहरीपणाला कंठाळलेल्या शेतकºयांनी शासनाकडून अनुदानावर संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेटसाठी अर्ज केले होते; मात्र निवड झालेल्या शेतकºयांनी दुष्काळामुळे शेडनेट उभारणीकडे पाठ फिरवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): निसर्गाच्या लहरीपणाला कंठाळलेल्या शेतकºयांनी शासनाकडून अनुदानावर संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेटसाठी अर्ज केले होते; मात्र निवड झालेल्या शेतकºयांनी दुष्काळामुळे शेडनेट उभारणीकडे पाठ फिरवली आहे.पालम तालुक्यात तालुका कृषी कार्यालयाकडून यावर्षीच्या उद्दिष्टानुसार ६ शेडनेट उभारणीसाठी मंजुरी दिली आहे. १२५ शेतकºयांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेटसाठी आॅनलाईन प्रस्ताव दाखल केले होते.शेतकºयांमध्ये चुरस निर्माण झाल्याने कृषी विभागाने सोडत पद्धतीने शेतकºयांची प्रतीक्षा यादी तयार केली होती. पिकांची पेरणी केल्यानंतर कृषी विभागाने शेतकºयांना शेडनेट उभारणीसाठी पूर्वसंमती दिली. यावर्षी शेडनेट उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. विशेष म्हणजे, दुष्काळामुळे फारसे उत्पादन हाती लागले नाही. शेडनेटसाठी बँकाही कर्ज देत नाहीत. शेडनेट उभारणीसाठी केवळ ६ ते १३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.पदरमोड करीत शेतकºयांना अगोदर पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे शासनाची योजना घेण्यापेक्षा त्याकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. पहिल्या टप्प्यात सहा शेतकºयांना पूर्वसंमती देण्यात आली होती. त्यातील तीन जणांनी शेडनेट उभारणी होणार नाही, असे कळविले आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील पुढील शेतकºयांना पूर्वसंमती देण्यात आली आहे.यातही कोणीही शेतकरी धजावत नाही. त्यामुळे शासनाची योजना कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण आहे.१०० टक्के अनुदान द्या४सध्या पालम तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पहिल्याच यादीमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामामधील पेरणीवर केलेला खर्च दुष्काळात वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकºयांना राज्य शासन व कृषी विभागाने मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या शेडनेट या योजनेवर १०० टक्के अनुदान देऊन प्रत्येक शेतकºयाच्या शेतामध्ये शेडनेटची उभारणी करावी. जेणेकरुन ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध आहे, ते शेतकरी दुष्काळाचा सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.अनुदानासाठीही माराव्या लागतात चकरा४कृषी विभाग शेतकºयांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असला तरी पालम तालुक्यातील कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या अनास्थेचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. शेतकºयांनी एखादी योजना आपल्या शेतात अंमलात आणली तर त्या योजनेसाठी शासनाकडून मिळणाºया अनुदानासाठी शेतकºयांना कमीत कमी सहा महिने कृषी विभागाकडे चकरा माराव्या लागतात. त्यामुळे स्वत: जवळील पैशांची गुंतवणूक करुन शासनाकडून मिळणाºया अनुदानासाठी चकरा मारण्यापेक्षा योजनेकडेच पाठ फिरवावी लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी