शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘जलयुक्त शिवार’ निधी परतीच्या जबाबदारीस खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:43 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षातील तब्बल ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा जिल्ह्याच्या हक्काचा निधी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे परत गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या कामचुकारपणाला जबाबदार कोण? हे मात्र निश्चित करण्यात आलेले नाही. परिणामी चालचढल करुन जिल्ह्याचे नुकसान करणारे अधिकारी नामनिराळे राहिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षातील तब्बल ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा जिल्ह्याच्या हक्काचा निधी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे परत गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या कामचुकारपणाला जबाबदार कोण? हे मात्र निश्चित करण्यात आलेले नाही. परिणामी चालचढल करुन जिल्ह्याचे नुकसान करणारे अधिकारी नामनिराळे राहिले आहेत.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्य शासनाच्या वतीने जलसंधारणाची कामे करण्यासाठी जिल्ह्याला २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. सदरील निधी २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ मधील कामावर खर्च करावयाचा होता. या निधीमधून २२ कोटी ६७ लाख ५३ हजार रुपये जलयुक्त शिवारसाठी तर १ कोटी ७२ लाख ८९ हजार रुपये गाळमुक्त धरण अभियानासाठी आणि आकस्मिक खर्चासाठी ३१ लाख ३५ हजार असा एकूण २४ कोटी ७१ लाख ७७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. विविध यंत्रणांनी केलेल्या मागणी प्रमाणे निधीचे वाटप करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ व २०१८-१९ मधील कामे पूर्ण न झाल्याने ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने शासनाला परत केला. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने १२ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर २६ जून रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी खा.बंडू जाधव व अन्य आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन प्रशासनास खुलासा करण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने ६ महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीचा अनुपालन अहवाल २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. सदरील अहवालात कोणत्या निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्याच्या हक्काचे सव्वा नऊ कोटी रुपये परत गेले, याची जबाबदारी निश्चिती केली जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु, या अहवालात तशी कुठलीही माहिती नमूद करण्यात आलेली नाही. या अंतर्गत २०१७-१८ मध्ये जालना येथील जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडील ८१ सिमेंट नाला बांधाची कामे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली. ही कामे पूर्ण न झाल्याने ६ कोटी ४ लाख ९५ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिला. तसेच जालन्यातील जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडील ९६ लाख ९८ हजारांची ८, कृषी विभागाकडील २० लाख ३८ हजारांची २९ व वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडील १० लाख २० हजारांची ५ अशी एकूण ४२ कामे मार्च २०१९ अखेर पूर्ण न झाल्याने या कामांचा १ कोटी २६ लाख ८६ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिला. तसेच २०१८-१९ मधील कृषी विभाग व वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाची कामे प्रगतीपथावर असल्याने त्यांनी संबंधित निधीची मागणी केली नाही. त्यामुळे १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला, असा तीन वर्षात अखर्चित राहिलेला ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा निधी शासनाकडे समर्पित करण्यात आला असल्याचीच माहिती अहवालात देण्यात आली आहे. त्यामुळे कामचुकार अधिकाºयांची जबाबदारी निश्चिती करण्यात आलेली नाही. परिणामी जिल्ह्याला विकासापासून दूर ठेवणारे हे निष्क्रिय अधिकारी नामनिराळे राहिले आहेत.मार्चपर्यंत : कामे पूर्ण करण्याचे आश्वासन४२०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षातील ९ कोटी २२ लाख रुपयांचा निधी शासनाला परत केल्यानंतर यावर्षातील अपूर्ण कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे, तशी माहिती नियोजन समितीच्या अनुपालन अहवालात देण्यात आली आहे.४२९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानच्या आढावा बैठकीतही अपूर्ण कामांना गती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पfundsनिधी