शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

परभणी : ‘जलयुक्त शिवार’ निधी परतीच्या जबाबदारीस खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:43 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षातील तब्बल ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा जिल्ह्याच्या हक्काचा निधी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे परत गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या कामचुकारपणाला जबाबदार कोण? हे मात्र निश्चित करण्यात आलेले नाही. परिणामी चालचढल करुन जिल्ह्याचे नुकसान करणारे अधिकारी नामनिराळे राहिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षातील तब्बल ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा जिल्ह्याच्या हक्काचा निधी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे परत गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या कामचुकारपणाला जबाबदार कोण? हे मात्र निश्चित करण्यात आलेले नाही. परिणामी चालचढल करुन जिल्ह्याचे नुकसान करणारे अधिकारी नामनिराळे राहिले आहेत.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्य शासनाच्या वतीने जलसंधारणाची कामे करण्यासाठी जिल्ह्याला २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. सदरील निधी २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ मधील कामावर खर्च करावयाचा होता. या निधीमधून २२ कोटी ६७ लाख ५३ हजार रुपये जलयुक्त शिवारसाठी तर १ कोटी ७२ लाख ८९ हजार रुपये गाळमुक्त धरण अभियानासाठी आणि आकस्मिक खर्चासाठी ३१ लाख ३५ हजार असा एकूण २४ कोटी ७१ लाख ७७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. विविध यंत्रणांनी केलेल्या मागणी प्रमाणे निधीचे वाटप करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ व २०१८-१९ मधील कामे पूर्ण न झाल्याने ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने शासनाला परत केला. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने १२ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर २६ जून रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी खा.बंडू जाधव व अन्य आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन प्रशासनास खुलासा करण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने ६ महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीचा अनुपालन अहवाल २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. सदरील अहवालात कोणत्या निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्याच्या हक्काचे सव्वा नऊ कोटी रुपये परत गेले, याची जबाबदारी निश्चिती केली जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु, या अहवालात तशी कुठलीही माहिती नमूद करण्यात आलेली नाही. या अंतर्गत २०१७-१८ मध्ये जालना येथील जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडील ८१ सिमेंट नाला बांधाची कामे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली. ही कामे पूर्ण न झाल्याने ६ कोटी ४ लाख ९५ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिला. तसेच जालन्यातील जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडील ९६ लाख ९८ हजारांची ८, कृषी विभागाकडील २० लाख ३८ हजारांची २९ व वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडील १० लाख २० हजारांची ५ अशी एकूण ४२ कामे मार्च २०१९ अखेर पूर्ण न झाल्याने या कामांचा १ कोटी २६ लाख ८६ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिला. तसेच २०१८-१९ मधील कृषी विभाग व वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाची कामे प्रगतीपथावर असल्याने त्यांनी संबंधित निधीची मागणी केली नाही. त्यामुळे १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला, असा तीन वर्षात अखर्चित राहिलेला ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा निधी शासनाकडे समर्पित करण्यात आला असल्याचीच माहिती अहवालात देण्यात आली आहे. त्यामुळे कामचुकार अधिकाºयांची जबाबदारी निश्चिती करण्यात आलेली नाही. परिणामी जिल्ह्याला विकासापासून दूर ठेवणारे हे निष्क्रिय अधिकारी नामनिराळे राहिले आहेत.मार्चपर्यंत : कामे पूर्ण करण्याचे आश्वासन४२०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षातील ९ कोटी २२ लाख रुपयांचा निधी शासनाला परत केल्यानंतर यावर्षातील अपूर्ण कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे, तशी माहिती नियोजन समितीच्या अनुपालन अहवालात देण्यात आली आहे.४२९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानच्या आढावा बैठकीतही अपूर्ण कामांना गती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पfundsनिधी