शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

परभणी : मुळी बंधाऱ्याने १७०५ हेक्टरवर सिंचन वाढले ; गोदावरी पाटबंधारे महामंडळाचा अजब अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:26 IST

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नसताना औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या बंधाºयामुळे ११़३५ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला असून, १७०५ हेक्टर सिंचन क्षमता झाल्याचा दावा करून ११ गावांना त्याचा लाभ झाल्याचा अहवाल नुकत्याच नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात सादर केला आहे़ त्यामुळे प्रत्यक्ष स्थळ स्थितीचा विचार न करता कागदोपत्री केलेले हे ‘सिंचन’ चर्चेचा विषय झाला आहे़

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नसताना औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या बंधाºयामुळे ११़३५ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला असून, १७०५ हेक्टर सिंचन क्षमता झाल्याचा दावा करून ११ गावांना त्याचा लाभ झाल्याचा अहवाल नुकत्याच नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात सादर केला आहे़ त्यामुळे प्रत्यक्ष स्थळ स्थितीचा विचार न करता कागदोपत्री केलेले हे ‘सिंचन’ चर्चेचा विषय झाला आहे़नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात औरंगाबाद येथील मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने २०१६-१७ या वार्षिक वर्षाचा आपला अहवाल सादर केला आहे़ या अहवालात यावर्षात विभागातील मोठे, मध्यम, लघु, उपसा प्रकल्पांना मिळालेला निधी, झालेली कामे, सिंचन क्षमतेत झालेली वाढ व प्रकल्पांची स्थिती याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे़ या अहवालात मागील तीन वर्षातील महामंडळांतर्गत प्रकल्पांच्या ठळक उपलब्धी देण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यातील ढालेगाव, मुदगल, मुळी व डिग्रस या चार बंधाऱ्यांसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे़ मुळी बंधाºयासंदर्भात दिलेली माहिती कागदोपत्री योग्य ती जुळविण्यात आली असून, सत्य स्थिती लपवून या बंधाºयाचा कसा फायदा झाला आहे, हेच दाखविण्याचा खटाटोप करण्यात आला आहे़ अहवालानुसार मुळी बंधाºयाचे काम २०११ मध्ये पूर्ण झाले असून, यामध्ये ११़३५ दलघमी पाणी साठा निर्माण झाला व १७०५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे़ त्याचा लाभ गंगाखेड तालुक्यातील ८ व सोनपेठ तालुक्यातील ३ अशा एकूण ११ गावांना झाल्याचा दावा करण्यात आला आहे़ परभणी जिल्ह्याशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचा हा अहवाल सत्य वाटू शकतो़ प्रत्यक्षात मात्र बंधाºयाची स्थिती वेगळी आहे़ बंधाºयात फक्त दोन फुटच पाणीसाठा होत आहे़ २०११ मध्ये या बंधाºयाचे काम पूर्ण झाल्यानंतर २०१२ मध्ये या बंधाºयावर २० स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले़ त्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात यातील ७ दरवाजे निखळून पडल्याने बंधाºयात साचलेले पाणी वाहून गेले़ त्यानंतरच्या कालावधीत फारसा पाऊस झाला नसल्याने बंधाºयात पाणी साठविण्याचा प्रश्नच आला नाही़ २०१६ मध्ये निखळून पडलेले ७ दरवाजे पाटबंधारे महामंडळाने बसविले़ त्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये बºयापैकी पाऊस झाल्याने बंधाºयात पाणी साठवण्यास सुरुवात झाली़ पाणीसाठा वाढल्याने पाण्याचा दाब वाढला़ त्यामुळे या महिन्यात या बंधाºयाचे १७ दरवाजे पुन्हा निखळून पडले़ त्यामुळे पुन्हा बंधाºयातील पाणी वाहून गेले़ त्यानंतर तब्बल तीन वर्षांपासून सातत्याने या बंधाºयाला व्हार्टीकल दरवाजे बसविण्याची मागणी या भागातील शेतकरी व नागरिक करीत आहेत़ यासाठी वेळोवेळी रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात आले; परंतु, हा प्रश्न सोडविण्यात आला नाही़ तो तसाच प्रलंबित ठेवण्यात आला आहे़ अशा स्थितीत या बंधाºयामुळे सिंचन क्षमता वाढल्याचा दावा करणे कितपत सत्य आहे? असा सवाल उपस्थित होत आहे़ अधिकारीस्तरावर आकड्यांचा ताळमेळ बसवून असे अहवाल दिले जातात़ त्यानंतर शासन सर्व काही सुजलाम् सुफलाम् असल्याचे समजून इतर सिंचन प्रकल्पांसाठी आखडता हात घेते़ परिणामी जुने प्रकल्प बंंद पडलेले असता व नविन प्रकल्पांना निधी नसल्याने कारण सांगूण मंजुरी मिळत नाही़ ही स्थिती संपूर्ण मराठवाडाभर आहे़ याचे गांभिर्य मात्र अधिकाºयांना वाटत नाही़ त्यामुळे आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीच यासाठी पुढाकार घेऊन कागदी ताळमेळ घालणाºया अधिकाºयांना याचा जाब विचारणे आवश्यक आहे़ढालेगाव, मुदगल, डिग्रसचा ५७ गावांना लाभगेदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या २०१६-१७ च्या वार्षिक अहवालात ढालेगाव, मुदगल व डिग्रस या गोदावरी नदीवरील तीन बंधाºयांच्या पाणी साठ्याचा ५७ गावांना लाभ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे़ ढालेगाव बंधाºयाचे काम २०११ साली पूर्ण झाले असून, यामध्ये १४़८७ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला व २१०० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली़ त्याचा पाथरी तालुक्यातील १० व माजलगाव तालुक्यातील ३ गावांना लाभ झाला़ मुदगल बंधाºयाचे काम २०१२ मध्ये पूर्ण झाले़ यामुळे ११़८७ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला व १९०० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली़ त्याचा लाभ पाथरी तालुक्यातील ८, सोनपेठ तालुक्यातील ४, माजलगाव तालुक्यातील ३ व परळी तालुक्यातील एका गावास झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे़ डिग्रस बंधाºयाचे काम २०१० साली पूर्ण झाले असून, यामध्ये ६३़८५ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला व ३६१८ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे़ याचा लाभ पूर्णा तालुक्यातील १०, परभणी तालुक्यातील ३, पालम तालुक्यातील ९ व गंगाखेड तालुक्यातील ६ गावांना झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे़ प्रत्यक्षात डिग्रस बंधाºयात परभणी जिल्ह्यासाठी फक्त ३३ टक्केच पाणीसाठा आरक्षित आहे़ उर्वरित ६७ टक्के पाणी नांदेड जिल्ह्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे़ या बंधाºयाचे संपूर्ण व्यवस्थापनही नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्प विभागाकडे आहे़ असे असतानाही या अहवाला मात्र नांदेडचा या प्रकल्पाच्या अनुषंगाने ओझरताही उल्लेख केलेला नाही़ त्यामुळे ही लपवाछपवी का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़बांधकाम साहित्य बंधाºयातच पडून४सिंचन क्षमता वाढल्याचा दावा करणाºया पाटबंधारे विभागाने या बंधाºयाचे काम झाल्यानंतर या कामाचे वापरात नसलेले साहित्य उचलण्याची तसदी घेतली नाही़ त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून हे साहित्य बंधाºयातच पडून आहे़ परिणामी बंधाºयाची खोली पाण्याने वाढण्या ऐवजी साहित्यानेच वाढली आहे़ त्यामुळे पाणी साठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प