शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

परभणी : खाजगी शाळांसाठी सुधारित आकृतीबंध लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:59 IST

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला असून तसा आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सोमवारी काढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला असून तसा आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सोमवारी काढला आहे.राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या निकषाच्या अनुषंगाने या कर्मचाºयांची पदे निश्चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये लोकप्रतिनिधी व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. या समितीने ३१ जुलै २०१५ रोजी आपला अहवाल शासनाला दिला. त्यामध्ये शिफारसी सूचविण्यात आल्या. त्यानुसार शिक्षकेत्तर पदांचा सुधारित आकृतीबंद निश्चित करण्याचा निर्णय १३ नोव्हेंबर २०११ च्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाºयांसाठी सुधारित आकृतीबंद लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाचवी ते बारावीपर्यंत ५०० पटसंख्या असलेल्या शाळेत एक कनिष्ठ लिपीक, ५०१ ते १ हजार विद्यार्थी संख्येपर्यंतच्या शाळेत एक कनिष्ठ, एक वरिष्ठ लिपीक, १००१ ते १६०० पर्यंतच्या शाळेत २ कनिष्ठ व १ वरिष्ठ लिपीक, १६०१ ते २२०० विद्यार्थी संख्येच्या शाळेत २ कनिष्ठ, १ वरिष्ठ व १ मुख्य लिपीक, २२०१ ते २८०० विद्यार्थी संख्येपर्यंतच्या शाळेत ३ कनिष्ठ लिपीक, १ वरिष्ठ व १ मुख्य लिपीकास मंजुरी देण्यात आली आहे. २८०० पेक्षा जास्त व त्यापुढील प्रत्येक ६०० विद्यार्थ्यांमागे ४ कनिष्ठ, २ वरिष्ठ, २ मुख्य लिपीक राहणार आहेत. सध्या राज्यात १७ हजार ६९५ कनिष्ठ, ४ हजार ९१२ वरिष्ठ व ९२६ मुख्य लिपीक कार्यरत आहेत. या शिवाय अधीक्षक पदही राहणार आहे. तसेच १ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी १ पूर्णवेळ ग्रंथपाल पद कार्यरत राहणार आहे, अशी राज्यात २ हजार १८ पदे सध्या कार्यरत आहेत. अर्धवेळ ग्रंथपाल पदावर १६०० कर्मचारी कार्यरत असून ते कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर सदरील पदे व्यपगत होणार आहेत. त्यामुळे ग्रंथपाल पदाचा संवर्ग मृत संवर्ग असल्याने नवीन पद भरती अथवा पद निर्मिती करु नये, असा शाळांना इशारा देण्यात आला आहे. प्रयोगशाळा सहाय्यकाची नववी ते दहावीच्या २०१ ते ७०० विद्यार्थ्यांसाठी १ पद मंजूर असून अशी राज्यात ४ हजार ४८ पदे मंजूर आहेत. ७०१ ते १५०० विद्यार्थी संख्येसाठी १ पद मंजूर असून अशी राज्यात ६१० पदे कार्यरत आहेत. १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत १ पद अधीक्षक पद मंजूर असून अशी एकूण २७ पदे राज्यात मंजूर आहेत. उच्च माध्यमिक शास्त्र शाखा भौतिकशास्त्र यासाठी एक अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यक मंजूर असून अशी राज्यात १ हजार २० पदे कार्यरत आहेत. जीवशास्त्रासाठी १ अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यकाचे पद मंजूर असून यासाठीची १ हजार २० पदे मंजूर आहेत.नवीन भरतीला दिला खोनव्या सुधारित आकृतीबंधामध्ये नवीन पदभरतीला खो देण्यात आला आहे. त्यामध्ये अधीक्षक पदावर कार्यरत राज्यातील १९ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सदरची पदे व्यपगत होणार आहेत. या पदावर नवीन भरती करु नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे अर्धवेळ ग्रंथपाल असलेले सध्याचे १६०० कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ती पदेही व्यपगत होणार असून त्या पदावर नव्याने भरती करु नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेली पदे आपोआप व्यपगत होतील, असे या आदेशात नमूद केल्याने खाजगी अंशत: /पूर्णत: अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये यापुढे शिक्षकेत्तर कर्मचाºयांची नवीन भरती होणे अवघड झाले आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचा पदासंदर्भातील आकृतीबंध मात्र शिक्षण विभाग नंतर जाहीर करणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी