शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांची परभणीत हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:21 AM

परभणी : दिव्यांगांना विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी दर बुधवारी पहाटे ५ पासून रांगेत टोकण मिळविण्यासाठी उभे ...

परभणी : दिव्यांगांना विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी दर बुधवारी पहाटे ५ पासून रांगेत टोकण मिळविण्यासाठी उभे रहावे लागत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परभणीत दिव्यांगांची हेळसांड होत असल्याचे बुधवारी केलेल्या पाहणीत समोर आले.

दिव्यांगांना शैक्षणिक, प्रवेश व नोकरीसाठी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. यासाठी दृष्टिदोष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहू दिव्यांगता यासारखे जवळपास १५ प्रकारांतील दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले जाते. कोरोनाकाळात बंद असलेले परभणी येथील अपंग बोर्ड मागील काही दिवसांपासून सुरू झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग रुग्णालयात दर बुधवारी आरोग्य तपासणीसाठी दिव्यांगांना दिवस राखून दिला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पहाटे ५ पासूनच टोकण मिळविण्यासाठी दिव्यांगांना व त्यांच्या नातेवाईकांना रांगेत उभे रहावे लागते. त्यानंतर तेथील स्थानिक कर्मचाऱ्यांकडून अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात येतो. त्यामुळे परभणी येथील रुग्णालयात दिव्यांगांची प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सध्या तरी हेळसांड सुरू असल्याचे बुधवारी दिसून आले.

दररोज केवळ ६० प्रमाणपत्रे

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात असलेल्या अपंग बोर्ड प्रशासनाकडून दर बुधवारी केवळ ६० दिव्यांगांची तपासणी करण्यात येते. विशेष म्हणजे भल्यापहाटे १०० हून अधिक दिव्यांग टोकण मिळविण्यासाठी रांगेत उभे असतात. ज्यांना टोकण मिळाले नाही, त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.

सोशल डिस्टन्सचा फज्जा

अपंग बोर्ड प्रशासनाकडून दिव्यांगांसाठी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही. बुधवारी केलेल्या पाहणीत भल्या पहाटे आलेल्या १०० हून अधिक दिव्यांगांपैकी केवळ ६० जणांना आत घेण्यात आले. या दिव्यांगांना अपंग बोर्ड कार्यालयासमोर बसविण्यात आले.

या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले नाही. विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाकडूनही याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत किंवा त्यांना मास्क व सॅनिटायझरही देण्यात आले नाही. त्यामुळे अपंग बोर्डाचा कार्यभार सांभाळणाऱ्या प्रशासनाकडून बुधवारी दिव्यांगांची हेळसांड झाली.

अपंग प्रमाणपत्र कशासाठी?

सध्या नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची गर्दी केली होती.

सध्या आरोग्य विभागासह इतर विभागांतील जागा निघाल्या आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी आवश्यक असणारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उमेदवार बुधवारी आल्याचे दिसून आले.

केंद्र व राज्य शासनाचा लाभ मिळविण्याबरोबर एसटी महामंडळाचा बस प्रवास सवलतीसाठी या प्रमाणपत्राची गरज असते.