शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

परभणी : निराधार मुलांचा आधार बनले पुण्यातील अशोक स्नेहवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:32 AM

दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या मराठवाड्याच्या पाचवीलाच पुंजलेले. यातून अनेक कुटुंब निराधार होतात. विशेषत: लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा निराधारांना आधार देण्यासाठी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील उच्च शिक्षित अशोक देशमाने या तरुणाने पुण्यात उभारलेले स्रेहवन एक आशेचा किरण बनले असून, अनेक निराधारांना आधार मिळाला आहे.

सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या मराठवाड्याच्या पाचवीलाच पुंजलेले. यातून अनेक कुटुंब निराधार होतात. विशेषत: लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा निराधारांना आधार देण्यासाठी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील उच्च शिक्षित अशोक देशमाने या तरुणाने पुण्यात उभारलेले स्रेहवन एक आशेचा किरण बनले असून, अनेक निराधारांना आधार मिळाला आहे.पुणे जिल्ह्यात भोसरी येथे आळंदी मार्गावर असलेल्या चक्रपाणी वसाहतीतील पत्र्याच्या पाच खोल्यांत वसलेले स्नेहवन म्हणजे अशोक देशमाने या युवकाच्या स्वप्नातील बाबा आमटे यांचे जणू आनंदवनच झाले आहे. मराठवड्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांची दत्तक घेतलेली ३० मुले येथे गुण्या गोविंदाने राहतात. आपण स्वीकारलेले व्रत हे सोपे नव्हते, याची अशोकला जाणीव होती. रात्र पाळीत कंपनीची नोकरी सांभाळून तो मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना इ. भागांत फिरायचा. तेथे आत्महत्याग्रस्त, कर्जबाजारी, ऊसतोड किंवा मजुरी करणाºया शेतकरी कुटुंबातील मुलाचा शोध घ्यायचा. आई किंवा वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आहे, असेही घर तो पाहायचा. आशातूनच मुले निवडण्यात आली. आज अशाच घरातील २५ मुलांना दत्तक घेत त्यांच्यासाठी पुण्यातील भोसरी येथे अशोक स्रेहवन सुरु केले आहे. याच नावाने संस्थेची नोंदणी केली आहे. अर्थात हे सगळे करण्यासाठी नोकरी सोडणे आवश्यक होते. साधारणत: आॅगस्ट २०१६ ची गोष्ट. कंपनीला तसा निर्णय कळविल्यानंतर तेथील अधिकारीही चक्रावून गेले. मात्र आपण हाती घेतलेले व्रत सोडायचे नाही, अशी मानसिकता अशोकने बनविली होती. स्रेहवन साकारताना सुरुवातीला मोठी अडचण झाली होती, ती भांडवलाची. मात्र शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपक्रम सुरु करायचा आहे, असे सांगितल्यानंतर नगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील अनिल कोटे यांनी आपले पाच खोल्यांचे घर मोफत उपलब्ध करुन दिले. त्याचबरोबर नोकरीत जमा केलेली दोन लाखांची पुंजीही अशोकने उपयोगात आणली. राहुल देशपांडे, सच्चिदानंद कुलकर्णी, अवधूत खरमाळे, नितीन जिरासे, कविता मरुडकर यांनी आपापल्यापरीने मदत करीत स्रेहवन उभारले.नोकरी सोडून शेतकºयांच्या मुलांना दत्तक घेण्याच्या संकल्पनेला अशोकच्या आई-वडिलांनी विरोध केला होता. मात्र आपल्या मुलाची धडपड, ध्येय, शेतकºयांच्या मुलाविषयी असलेली कणव या गोष्टी पाहता त्यांनीही मुलाला या प्रवासात साथ देण्याचे ठरविले. आपले गाव सोडून ते मुलांसोबत राहतात. अशोकचे वडील वारकरी सांप्रदायातील असल्याने मुलांना मूल्यशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.एकीकडे नोकरी सोडली असताना दुसरीकडे अशोकचे आई-वडिल घरी सून आणण्याच्या तयारीत होते. शेतकरी सुनील काठोळे हे देशमाने यांच्या नात्यातील होते. त्यांच्या अर्चना या मुलीचे स्थळ सांगून आले होते. हाती नोकरी नाही आणि डोक्यात तर स्नेहवन घडविण्याचे स्वप्न ही सर्व स्थिती अशोकने अर्चनाला समजून सांगितली. लग्नाच्या दुसºयाच दिवशी पाच खोल्यांच्या पत्र्याच्या घरात म्हणजेच स्रेहवनमध्ये अशोक, अर्चना व त्यांचे स्रेहवन कुुटुंब एकमेकांत मिसळून गेले.चार कोटींची जमीन दानभोसरीतील डॉ.रवींद्र कुलकर्णी आणि डॉ. स्मिता कुलकर्णी या दाम्पत्याने स्वत:ची दोन एकर जागा आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी काम करणाºया स्रेहवन संस्थेला दान केली. त्यामुळे जागेचा प्रश्न मिटला.दरम्यान, स्रेहवनच्या माध्यमातून शेतकºयांच्या मुलांसाठी आणखी वाढीव काम करण्याची इच्छा आहे. समाजातील दानशुरांनी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्यास अनेक प्रस्तावित कामे मार्गी लागतील, असे ‘लोकमत’शी बोलताना अशोक देशमाने यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरीPuneपुणे