शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

परभणी : ९ गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:12 AM

मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे.वीज वितरण कंपनीने पूर्णा शहर व ग्रामीण भागामधील वीज बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी विविध भागांत पथक तयार केले असून या पथकाच्या माध्यमातून वीज बिल वसुली करण्यात येत आहे. मागील एक वर्षापासून वीज बिल न भरणाऱ्या गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये सिरकळस, माखणी, खांबेगाव, धानोरा मोत्या, चांगेफळ, कंठेश्वर, आजदापूर, कानखेड- १, कानडखेड -२ या नऊ गावांचा मागील आठवड्यापासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून या नऊ गावांमध्ये वीज बिलापोटी १ कोटी ३० लाख रुपये थकित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.पाणीटंचाईचे संकट४पूर्णा तालुक्यातील नऊ गावांमधील वीजपुरवठा महावितरणच्या वतीने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. यापूर्वी अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; परंतु, काही गावांनी अपेक्षित बिलाची रक्कम जमा केल्याने त्या गावातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वीज वितरण कंपनीने खंडित केलेल्या नऊ गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.वीजपुरवठा खंडित केलेल्या गावातील ग्रामस्थांना किमान मागील एक वर्षाचे वीज बिल भरणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी थकित वीज बिल भरल्यास महावितरणकडून नऊ गावांचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.-सचिन कल्याणकर,उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमनwater scarcityपाणी टंचाई