कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांना कार्यालयात जाउन शिवीगाळकरुन धमकवल्या प्रकरणी डॉ. अंकुश लाड यांच्याविरोधात मंगळवारी (दि.२४ ) रात्री साडे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल केला. ...
विधानपरिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने मतदारांची प्रारुप यादी जाहीर केली असून २७ एप्रिलपर्यंत या यादीवर दावे व हरकती मागविल्या आहेत. ...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २२ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात ७०८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून २ कोटी ६३ लाख ८३ हजार ६५३ रुपयांची वसुली झाली आहे. ...
शहरातील नागरिकांनी २२ दिवसांमध्ये महापालिकेकडे करापोटी तब्बल ३ कोटी २३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. मनपा प्रशासनाने शास्तीच्या रक्कमेत सूट दिल्याने वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...
२०१८-१९ या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना प्रमाणित व दर्जेदार बियाणे वाजवी दरात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ...
जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. १६ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून या गावांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. तर १०३ विहिरी अधिग्रहित करुन या विहिरींचे पाणी टंचाईग्रस्त गावासाठी खुले करुन दिले आहे. ...
कठुआ व उन्नाव येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेप्रमाणी पुकारलेल्या शहर बंद दरम्यान ६ बसवर दगडफेक करुन दीड लाख रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी कोतवाली आणि नानलपेठ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ...
येथील बसस्थानकावर एका वृद्धाला लुटण्याचा प्रकार होत असल्याचे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निदर्शनास आल्यानंतर पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला. ...
लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या २३ लघुप्रकल्पांपैकी १६ प्रकल्प कोरडेठाक पडल्याने ग्रामीण भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आ ...