शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

परभणी जिल्ह्यात केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:59 PM

जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला असून, जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीप्रश्न गंभीर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला असून, जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीप्रश्न गंभीर होत आहे.मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. जिंतूर तालुक्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे या प्रकल्पात पाणीसाठाच झाला नाही. परभणीसह जिंतूर, पूर्णा, हिंगोली शहराला येलदरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या मात्र प्रकल्प मृतसाठ्यात गेला आहे. त्यामुळे परभणी, पूर्णा या शहरांसाठी सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घ्यावे लागत आहे.जिल्ह्यातील चौदा प्रकल्पांमध्ये एकूण ७० दलघमी पाणीसाठा असून, या साठ्यातून किती गावांना पाणी पुरेल, असा प्रश्न निर्माण होत आहे. येलदरी, मासोळी मध्यम प्रकल्प आणि मुळीचा बंधारा पूर्णत: कोरडा पडला आहे. करपरा मध्यम प्रकल्पात १२ टक्के, डिग्रस, मुद्गल व ढालेगाव बंधाऱ्यात प्रत्येकी १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सेलू येथील निम्न दुधना प्रकल्पातच सर्वाधिक १९.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४५.९४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा या प्रकल्पात असून, परभणी, पूर्णा, सेलू, मानवत या चार शहरांसह तालुक्यातील अनेक गावांची पाण्याची भिस्त याच प्रकल्पावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी निम्न दुधनातून नांदेड शहरासाठीही पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. या प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता, हा पाणीसाठा जिल्ह्यासाठीच वापरावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईRainपाऊस